शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल एअर अहवाल : भारतात २०१९ मध्ये १.१६ लाख नवजात दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:02 IST

अमेरिकास्थित हेल्थ इफ्टेक्स्‌ इन्स्टिट्यूट अँड ग्लोबल बर्डन ऑफ  डिसिजने पहिल्यांदाच  अत्याधिक वायू प्रदूषणाचा नवजात बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उपखंडनिहाय विश्लेषणात्मक अहवाल जारी केला आहे. 

नवी दिल्ली : वायू प्रदूषणाच्या जीवघेण्या परिणामांच्या भयानक वास्तवाकडे लक्ष वेधताना ग्लोबल एअर २०२० च्या अहवालातून वायू प्रदूषण वेळीच नियंत्रित न केल्यास मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत गंभीर इशारा  दिला आहे. या अहवालानुसार २०१९ मध्ये  वायू प्रदूषणामुळेभारतात  १,१६००० नवजात बालके जन्मानंतर महिनाभरात दगावली. नायजेरिया,  पाकिस्तान, इथोपिया आणि डेमॉक्रॅटिक ऑफ कांगोपेक्षाही भारतातवायू प्रदूषणामुळे नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे  प्रमाण अधिक आहे. 

अमेरिकास्थित हेल्थ इफ्टेक्स्‌ इन्स्टिट्यूट अँड ग्लोबल बर्डन ऑफ  डिसिजने पहिल्यांदाच  अत्याधिक वायू प्रदूषणाचा नवजात बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उपखंडनिहाय विश्लेषणात्मक अहवाल जारी केला आहे. 

ग्लोबल एअरच्या अध्ययनानुसार   वायू प्रदूषणाचा गर्भवती मातेवर होणाऱ्या परिणामांमुळे  ३७ आठवड्यांपूर्वी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे वजन २५०० ग्रॅम असते. जन्मत: वजन कमी असल्याने श्वसनमार्गात होण्याची, तसेच अतिसारासोबत कावीळ व अन्य गंभीर संसर्ग होण्याची जोखीम असते. यामुळे मृत्यू होऊ शकतो. गर्भवती मातेवर वायू प्रदूषणाचा परिणाम होत असला तरी यामागची जीवशास्त्रीय कारणे पूर्णत: माहीत नाहीत. गर्भवाढ होताना वायू प्रदूषणामुळे होणारे परिणाम तंबाखू सेवन, धूम्रपानासारखेच असतात. तंबाखू सेवन, धूम्रपान हे मुदतपूर्व जन्म आणि जन्मत: वजन कमी असण्यामागचे घटक आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन (आयसीएमआर) केंद्राच्या संचालक (वायूगुणवत्ता, हवामान आणि आरोग्य प्रगत संशोधन) कल्पना बालकृष्णन यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार वायूगुणवत्ता राखल्यास भारतातील १,१६,००० नवजात बालकांचा मृत्यू टाळता येऊ शकला असता. आयसीएमआरसह ७० संस्थांनी केलेल्या अध्ययनानुसार घरगुती आणि वायू प्रदूषणाचा गरोदरपणात विपरीत परिणाम होतो. 

५० टक्के नवजात बालकांचा मृत्यू  घराबाहेरील वायू प्रदूषणामुळे झाला. वायू प्रदूषणाचा मानवावर घातक परिणाम होत असताना जगभरातील अनेक देशांनी वायू प्रदूषण कमी करण्याकामी फारसे काम केलेले नाही.

वायू प्रदूषणामुळे उपसहारा विभागात 2.36.000 नवजात बालकांचा मृत्यू झाला. यात भारतत - 1.16.000, पाकिस्तानात - 56.500, नायजेरियात - 67.900, इथोपियामध्ये - 22.900, तर कांगो मध्ये - 1,200 नवजात बालकांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणIndiaभारतPakistanपाकिस्तान