शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्येवर शेतकऱ्यांचा जबरदस्त तोडगा, आंदोलन स्थळावर लावले सोलार पॅनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:35 IST

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

नवी दिल्ली - येथे प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुरुवारी सरकारकडून शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात, गाझीपूर बॉर्डरवरील आंदोलन स्थळावरील टेंट काढून, तेथील वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला होता. मात्र, तरीही त्याचा शेतकऱ्यांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. उलट, यावर तोडगा काढत या शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी विजेच्या व्यवस्थेसाठी सोलार पॅनल आणि सोलार इंव्हर्टर लावायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर मोबाईल चार्ज करण्यासाठी या शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्सदेखील तयार केले आहेत.

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 26 जानेवारीनंतर आता आंदोलन जवळपास संपले आहे, असे वाटू लागले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी राकेश टिकैत यांचे व्हिडिओ टीव्हीवर दाखविण्यात आल्याने परिस्थिती पुन्हा वेगाने बदलली आणि शेतकरी पुन्हा आंदोलन स्थळी परतायला सुरुवात झाली. 

Farmer protest: आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?

गाझीपूर बॉर्डरवर भारतीय किसान यूनियन (बीकेयू)च्या समर्थक शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मेरठ, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुराबादाबाद तसेच बुलंदशहरासारख्या पश्चिम उत्तर प्रदेशामधील जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी यूपी गेटवर पोहोचले आहेत. केंद्र सरारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गेल्या 28 नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

गाझीपूर बॉर्डरवर अद्यापही मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. तसेच आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.

Farmer Protest: शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर; पंतप्रधान मोदींची भावनिक साद

मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना घातली भावनिक साद - कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकते. संवादाचे द्वार नेहमीच खुले आहे, असे पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत म्हणाले. 'कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या विधानाचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नसला तरीही आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी यावर चर्चा करावी. शेतकरी आणि माझ्यात केवळ एका कॉलचे अंतर आहे,' असे मोदींनी म्हटले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश