शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 8:46 PM

"जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे."

ठळक मुद्देउमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भोपाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोडण्याच्या विचारांचे भाजपा नेत्या उमा भारती स्वागत केले आहे. आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा, असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती. म्हणून मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते आणि त्या आदराच्या भावनेनेच मी असे बोलत आहे, असे विधान उमा भारती यांनी केले आहे. 

याचबरोबर, भारतीय लोकांनी अमेरिकेत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत अभिमान बाळगावा, असेही उमा भारती यांनी सांगितले. कमला हॅरिस या अमेरिकी आहेत, तशाच त्या भारतीय देखील आहेत. त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकेत जन्माला आलेल्या महिला आहेत. त्यांच्या संपूर्ण निष्ठा या अमेरिकेशी जोडलेल्या आहेत. भारतीयांना जर अभिमान बाळगायचाच असेल तर अशा लोकांचा बाळगा जे भारतीय आहेत आणि त्यांनी जगात नाव कमावले आहे, असे उमा भारती म्हणाल्या.

जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे. अमेरिकेचे मूळ लोक रेड इंडियन आहेत. अमेरिकेत आज जे लोक आहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्यापैकीच कमला हॅरिस या एक आहेत, असे उमा भारती यांनी सांगितले. याशिवाय, ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत भारतीय लोकांना अभिमान बाळगावा, अशा महिलांमध्ये इंदिरा गांधी आहेत, सुषमा स्वराज आहेत, तसेच आणखी कितीतरी लोक आहेत, कितीतरी महिला आहेत, असेही उमा भारती म्हणाल्या.

याशिवाय, उमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर मला अतिशय दु:ख झाले. हे सर्व प्रकरण आता कोर्टात आहे. सीबीआयही जगातीव मान्यताप्राप्त संस्था आहे. आम्ही त्यांच्या तपासकार्यावर परिणाम होईल असे काही बोलता कामा नये, असे उमा भारती यांनी सांगितले. तसेच, रिया चक्रवर्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. मात्र, ज्या व्यक्तीचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध झालेला नाही, तो पर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार आहे, असे मानता कामा नये. अशा व्यक्तीला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, किती दु:ख सहन करावे लागत असेल?. मात्र, नंतर ती व्यक्ती निर्दोष सिद्ध झाल्यानंतर तिने भोगलेल्या दु:खापासून तिला कशी काय मुक्ती मिळणार? म्हणूनच मी म्हणते की हे प्रकरण प्रसारमाध्यमे आणि नेत्यांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. यावर राजकारण करू नये, असे उमा भारती यांनी म्हटले.

दरम्यान, काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस