शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 15:24 IST

 भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली -  भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र आता या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यापैकी काही वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी आपण अशा प्रकारच्या पत्रावर सह्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर काही अधिकाऱ्यांनी मात्र आपण पत्र वाचल्यानंतर त्याखाली आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिल्याचे मान्य केले आहे.  दरम्यान, अशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे.  पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवामा हल्ल्यात शहिदांना आणि बालाकोट येथे एअरस्ट्राइक करणाऱ्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील आपल्या सभेत केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच लष्कातील अनेक माजी अधिकाऱ्यांनीही सैन्याच्या राजकीय वापराबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, भाजपकजून भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असतानाच, माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहल्याचे वृत्त आले होते. तीन माजी सेनाप्रमुख आणि 156 अधिकाऱ्यांनी हे पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या पत्रात उल्लेख असलेले माजी सेना अधिकारी जनरल एस. एफ. रॉड्रिक्स यांनी तसेच माजी हवाई दलप्रमुख एन. सी. सुरी यांनी अशा प्रकारचे पत्र लिहिण्यास आणि त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास आपण सहमती दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे मेजर जनरल हर्ष कक्कड यांनी आपण हे पत्र वाचल्यानंतर त्यात आपल्या नावाचा समावेश करण्यास परवानगी दिली होती असे म्हटले आहे. याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही अशा प्रकारचे पत्र लिहिल्याचे मान्य केले आहे.  

 

लष्करी अधिकारी एस. एफ. रॉड्रिग्स यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र लिहिल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या नावे फिरत असलेल्या एका पत्रामध्ये एस. एफ. रॉड्रिग्स यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

माजी एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी यांनीही अशा प्रकारच्या पत्रावर सही केल्याचे वृत्त फेटाळले आहे. ''हे काय चालू आहे मला माहिती नाही. मी माझ्या संपूर्ण जीवनात राजकारणापासून दूर राहिलो आहे. 42 वर्षे अधिकाऱी म्हणून काम केल्यानंतर आता हे होऊ शकत नाही. जीवनात मी नेहमी देशाला प्राधान्य दिले आहे. अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवत आहे हे मला माहित नाही. हे फेक न्यूजचे उत्तम उदाहरण आहे."' असे सुरी म्हणाले. तसेच अॅडमिरल रामदास यांनी लिहिलेले हे पत्र नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. एल. नायडू यांनीही अशे पत्र लिहिण्यापूर्वी आपल्याकडून परवानगी घेतली असल्याचे किंवा आपण अशा प्रकारचे कुठले पत्र लिहिल्याचे वृत्त फेटाळले आहे. 

मात्र मेजर जनरल हर्ष कक्कर यांनी या पत्रावर आपली सही असल्याचे मान्य केले आहे. तसेच संपूर्ण विषय वाचल्यानंतरच आपण या पत्राला सहमती दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्याशिवाय माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनीही असे पत्र लिहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण