Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:21 IST2025-10-06T09:20:11+5:302025-10-06T09:21:08+5:30

Jaipur SMS Hospital Fire: रविवारी रात्री उशिरा जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये आगीची घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

'Fire was reported 20 minutes ago, but the doctor fled'; Shocking claim by eyewitnesses at SMS Hospital | Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा

Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा

Jaipur SMS Hospital Fire:राजस्थानच्या जयपूरमधील सवाई मानसिंह रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू विभागात पहाटे भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत आता प्रत्यक्षदर्शींने धक्कादायक दावा केला आहे. 

भरतपूर येथील रहिवासी शेरू यांनी त्यांच्या आईला डोळ्यांसमोर जीवनासाठी संघर्ष करताना पाहिले. २० मिनिटे आधीच धूर सुरू झाला होता. आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितले, पण कोणीही लक्ष दिले नाही,” असे शेरू यांनी सांगितले. “हळूहळू, प्लास्टिकच्या नळ्या वितळू लागल्या आणि वॉर्ड बॉय पळून गेले. आम्ही आमच्या आईला स्वतः बाहेर काढले.”अपघातानंतर दोन तासांनी त्यांच्या आईला तळमजल्यावर हलवण्यात आले होते, पण तिला अद्याप तिची प्रकृती कशी आहे हे सांगण्यात आलेले नाही.

जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

अग्निशमन दलाचे जवान अवधेश पांडे यांनी त्या घटनेबाबत माहिती दिली. “अलार्म वाजताच आमची टीम घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण वॉर्ड धुराने भरला होता. आत जाणे अशक्य होते. इमारतीच्या दुसऱ्या बाजूने काच फुटली होती.  पाणी फवारण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी दीड तास लागला. तोपर्यंत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी आयसीयूमध्ये ११ रुग्ण होते. ट्रॉमा सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. अनुराग धाकड म्हणाले, “आमच्याकडे स्वतःचे अग्निशमन उपकरणे होती. आम्ही प्रयत्न केले, पण विषारी वायू इतक्या वेगाने पसरला की कर्मचाऱ्यांना आत राहणे अशक्य झाले. पाच रुग्णांना कसेबसे वाचवण्यात आले, पण उर्वरित सहा जणांना वाचवता आले नाही.”

या दुर्घटनेत पिंटू (सीकर), दिलीप (आंधी, जयपूर), श्रीनाथ (भरतपूर), रुक्मणी (भरतपूर), कुष्मा (भरतपूर), सर्वेश (आग्रा), बहादूर (सांगनेर) आणि दिगंबर वर्मा यांचा मृत्यू झाला. 

आगीनंतर, ट्रॉमा सेंटरच्या बाहेर कुटुंबीय संतापाने भडकले. लोक रडत होते आणि ओरडत होते, "डॉक्टर कुठे आहेत? आम्हाला सांगा, आमचे प्रियजन जिवंत आहेत का?" गृहराज्यमंत्री जवाहर सिंह घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जमावाने घेरले होते. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, "आम्ही आगीबद्दल कर्मचाऱ्यांना २० मिनिटे आधी कळवले होते, पण कोणीही लक्ष दिले नाही. जर वेळीच कारवाई केली असती तर कदाचित आमचे प्रियजन वाचले असते."

Web Title : जयपुर अस्पताल में आग: लापरवाही का आरोप; चेतावनी को अनदेखा करने पर मरीज़ों की मौत

Web Summary : जयपुर के एसएमएस अस्पताल के आईसीयू में आग लगने से छह की मौत हो गई। प्रत्यक्षदर्शियों का दावा है कि चेतावनियों को अनदेखा किया गया, कर्मचारी भाग गए और परिवार जानकारी के लिए बेताब रहे। परिजनों ने लापरवाही से मौत होने का आरोप लगाया।

Web Title : Jaipur Hospital Fire: Negligence Alleged; Patients Died After Warning Ignored

Web Summary : A fire at Jaipur's SMS Hospital ICU killed six. Witnesses claim warnings were ignored, staff fled, and families were left desperate for information. Relatives allege negligence led to preventable deaths.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.