नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या युद्धात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाविरुद्धची लढाई दीर्घकाळ सुरू राहणार आहे. त्यामुळे न थकता, न हरता प्रयत्न करत राहायचंय. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर काही संकल्पना ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं.
- गरिबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी सेवा अभियान- एखाद्याच्या मदतीसाठी जाताना फेस मास्क जरुर वापरा. ही सवय ठेवा. स्वत:सोबतच इतरांसाठीही फेस मास्क तयार करा.- डॉक्टर, पोलीस, नर्स, सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार माना. त्यासाठी त्यांना पत्र लिहा- आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करा आणि इतरांनादेखील करण्यास सांगा. कमीत कमी ४० जणांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतु डाऊनलोड करा.- लाखो लोक पीएम केअर्स फंडमध्ये दान करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये दान करावं आणि इतर ४० जणांनाही दान करण्यास सांगावं.- प्रत्येक कार्यकर्त्यानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करानं आणि इतरांनादेखील करण्यास सांगावं.