शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आठवड्यातील चार दिवस दिवसा १२ तास वीज

By admin | Updated: September 15, 2016 01:01 IST

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही.

समीर कुणावार यांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासावर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. याबाबत ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी दिली.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. पाऊस आला तर एकदम येतो. नाही तर चांगलीच दडी मारतो. यामुळे शेतकरी अडचणीत असताना वीज वितरण कंपनीही नेमकी शेतीला ओलित करण्याच्या वेळेतच भारनियमाच्या नावावर वीज पुरवठा खंडित करते. यामुळे दोन्ही बाजुने शेतकरी पिंजला जात आहे. काही शेतकऱ्यांनी ही बिकट परिस्थिती आ. समीर कुणावार यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिली. आ. कुणावार यांनी या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन २४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. ऐन ओलिताच्या वेळीच भारनियमन होत असल्यामुळे शेतीता पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात भारनियमन करु नये, अशी विनंती केली. ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री हिंगणघाट येथे आले असता या पत्राचे पुनश्च स्मरण करुन दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ही बाब गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. ना. बावणकुळे यांनीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले, ही बाब खुद्द ना. बावळकुळे यांनी दूरध्वनीद्वारे कळविली असल्याची माहिती आ. कुणावार यांना दिली. यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)