शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका; आंदोलक शेतकऱ्यांचा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 7:41 PM

Farmer Protest : शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर आज सिंघु सीमेवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. गेले 28 दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर घेराव घालून बसलेले आहेत. सुरुवातीला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने देशभरातील विरोध आणि तीव्रता पाहून चर्चेचे दरवाजे सुरु केले खरे मात्र शेतकऱ्यांनी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारेने तीन महिन्यांपूर्वी आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महिना होणार आहे. गेले 28 दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर घेराव घालून बसलेले आहेत. सुरुवातीला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने देशभरातील विरोध आणि तीव्रता पाहून चर्चेचे दरवाजे सुरु केले खरे मात्र शेतकऱ्यांनी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. मोदी सरकार, हट्ट सोडा! आगीशी खेळ करू नका, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर आज सिंघु सीमेवर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अन्य राज्यांमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. ते एवढे ताकदीचे नाहीय. हे आंदोलन आणखी तीव्र करण्यास सांगितले जाणार आहे. याचबरोबर सरकारकडे गुप्तहेर आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. एवढेच नाही तर राजस्थान, गुजरातहून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलकांना येऊन मिळाले आहेत, असे या नेत्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या पत्राला उत्तर देताना स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आंदोलक शेतकरी हे संकटग्रस्त नसून ते राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, अशी वागणूक मोदी सरकार देत आहे. सरकारचे हे वागणे शेतकऱ्यांना आंदोलन आणखी तीव्र करायला भाग पाडत आहे. सरकार तथाकथित शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करत आहे, त्यांच्या आमच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाहीय. आमचे आंदोलन संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. 

भारतीय किसान युनियनचे युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, ज्या प्रकारे केंद्र ही चर्चा पुढे नेत आहे, त्यावरून हे स्पष्ट होतेय की सरकार मुद्दामहून विलंब करू पाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तुटेल असा प्रयत्न आहे. सरकार आमचे मुद्दे हलक्यात घेत आहे. लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा हा आमचा इशारा आहे. सरकारने आगीशी खेळू नये आणि हट्ट सोडून आमची कायदे रद्द करण्याची मागणी ऐकावी.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी