शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

एक्झिट पोलसारखे निकाल लागले नाही तर 'हा' असेल भाजपाचा प्लॅन बी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 4:39 PM

देशाच्या राजकारणात तिसरी आघाडी कठीण प्रसंगात होते आणि अशी आघाडी झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही हा इतिहास आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील नागरिकांनी विश्वास ठेऊन भाजपाला मतदान केल्याचं सांगण्यात सांगण्यात येतं. मात्र सोमवारी नागपुरात आरएसएसचे नेते भैय्याजी जोशी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे. 

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आरएसएस नेते आणि नितीन गडकरी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या भूमिकेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील सरकारमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका काय असेल याबाबत या बैठकीत चर्चा झाली. नितीन गडकरी हे आरएसएसच्या जवळचे नेते आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशात एनडीए सत्तेत आल्यानंतर गडकरी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीत भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी सरकारी योजनांवर चर्चा झाल्याचं सांगितले. 

नितीन गडकरी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या पोस्टर्सचे अनावरण करताना माध्यमांशी संवाद साधला यामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, एक्झिट पोलचे निर्णय अंतिम नसतात मात्र संकेत असतात. भाजपा बहुमत पार करेल आणि पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला आहे. 

एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येईल असं चित्र असलं तरी पक्षाकडून प्लॅन बी आखण्यात आला आहे. या प्लॅन अंतर्गत भाजपाकडून शक्य तितक्या घटकपक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात भाजपा आघाडीसाठी प्रयत्न करतेय. तेलुगू राज्य तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याठिकाणी दोन असे पक्ष आहेत ज्यांनी अद्याप ठोस भूमिका घेतली नाही. केंद्रात सत्ता स्थापनेवेळी हे दोन पक्ष यूपीए असो वा एनडीए कोणाच्या बाजूने मतदान करतील हे आता सांगता येणार नाही. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव आणि वायएसआरचे प्रमुख जनमोहन रेड्डी यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. 

देशाच्या राजकारणात तिसरी आघाडी कठीण प्रसंगात होते आणि अशी आघाडी झालीच तर ती जास्त दिवस टिकत नाही हा इतिहास आहे. जर भाजपा 300 आकडा पार करु शकली नाही तर अशा परिस्थितीत अन्य पक्षांच्या मदतीची भाजपाला गरज पडेल. सध्याच्या सर्व्हेनुसार यूपी, बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपाला किती जागा मिळतात याकडे पक्षाचे लक्ष आहे. कारण यूपीमध्ये 80, महाराष्ट्रात 48, बिहारमध्ये 40, पश्चिम बंगाल 42 अशा एकूण जागा 210 जागांवर भाजपाच्या सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाला विश्वास आहे. जर या राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही तर अन्य पक्षाचा पाठिंबा भाजपाला घ्यावा लागेल. त्याचसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या नेत्यांना डिनरसाठी दिल्लीत आमंत्रित केलं आहे. या डिनरमधून भाजपा निकालानंतरची रणनीती आखण्याची तयारी आहे.    

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलNarendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरीAmit Shahअमित शहा