"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:44 IST2025-12-28T16:44:03+5:302025-12-28T16:44:34+5:30

Mallikarjun Kharge, Congress vs BJP: "काँग्रेसने धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवलं, राजकारणासाठी वापर केला नाही"

Even though Congress is not in power our backbone is still strong says Mallikarjun Kharge | "काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका

"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका

Mallikarjun Kharge, Congress vs BJP: काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, आमची शक्ती कमी झाली असेल किंवा आमच्या सत्ता नसेल, पण आमचा कणा अजूनही ताठ आहे, अशा शब्दांत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्तच्या भाषणात भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना खरगे म्हणाले की, काँग्रेसने कधीही सत्तेसाठी सौदेबाजी केली नाही. तसेच संविधान, धर्मनिरपेक्षता किंवा गरिबांच्या हक्कांशी तडजोड केली नाही.

नेमके काय म्हणाले खरगे?

"काँग्रेसमुक्त भारत करण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत. काँग्रेस संपली आहे असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, आमच्याकडे सामर्थ्य, बळ किंवा सत्ता काही प्रमाणात कमी असू शकते, पण आमचा पाठीचा कणा अजूनही ताठ आहे. आम्ही सत्तेसाठी कुणापुढे झुकलेलो नाही. आम्ही सत्तेत नसलो तरी आम्ही सौदेबाजी करणार नाही. काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली मते मागितली नाहीत. मंदिरे आणि मशिदींच्या नावाखाली द्वेष पसरवला नाही," असे खरगे यांनी ठणकावून सांगितले.

"काँग्रेस जोडण्याचे काम करते"

भाजपवर निशाणा साधताना खरगे म्हणाले, "काँग्रेस नेहमी जोडण्याचे आणि एकत्र येण्याचे काम करते, तर भाजप तोडण्याचे आणि फोडाफोडीचे राजकारण करते. काँग्रेसने नेहमीच धर्माला श्रद्धेपुरते मर्यादित ठेवले आहे, परंतु काही लोकांनी त्याचा वापर राजकारणातील शस्त्र म्हणून केला आहे. आज भाजपकडे सत्ता आहे, पण सत्य नाही. म्हणूनच कधी डेटा लपवला जातो, कधी जनगणना थांबवली जाते, तर कधी संविधान बदलण्याची चर्चा होते."

"गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने काँग्रेसने उभारी दिलेल्या संस्था कमकुवत केल्या. भाजपच्या राज्यात राष्ट्रीय संपत्तीसोबतच पाणी, जंगले आणि जमीनही धोक्यात आहे. अनेक आरएसएस आणि भाजप नेत्यांनी संविधान, तिरंगा ध्वज, अशोक चक्र आणि वंदे मातरम देखील स्वीकारलेले नाहीत. आरएसएस-भाजप नेत्यांनी नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी बनवलेल्या कायद्यांना विरोध केला आहे आणि लोकांचे हक्क दडपण्याचे काम केले आहे," असा घणाघाती आरोप खरगे यांनी केला.

Web Title : कांग्रेस सत्ताहीन होने पर भी मजबूत, खरगे ने स्थापना दिवस पर बीजेपी को घेरा।

Web Summary : खड़गे ने बीजेपी पर हमला करते हुए कहा कि कांग्रेस में शक्ति की कमी हो सकती है लेकिन वह अडिग है। उन्होंने धर्मनिरपेक्षता और गरीबों के प्रति कांग्रेस की प्रतिबद्धता की पुष्टि की, बीजेपी पर विभाजनकारी राजनीति और संस्थानों को कमजोर करने का आरोप लगाया। उन्होंने डेटा छुपाने और संवैधानिक मूल्यों को कमजोर करने के लिए उनकी आलोचना की।

Web Title : Congress strong despite lacking power, Kharge slams BJP on foundation day.

Web Summary : Kharge attacked BJP, stating Congress may lack power but remains steadfast. He affirmed Congress's commitment to secularism and the poor, accusing BJP of divisive politics and weakening institutions. He criticized them for concealing data and undermining constitutional values.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.