शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर भाविकांनी प्राण गमावूनही केरळमधील मंदिरात फटाक्यांवर बंदी नाहीच

By admin | Updated: April 11, 2016 16:26 IST

केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाने फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला

ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपुरम, दि. ११ - केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध  पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाला अद्यापही जाग आली नसून मंदिरातील फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला आहे. राज्यातील १,२५५ मंदिरांचा कारभार सांभाळणा-या त्रावणकोर देवास्वोम बोर्डाने हा निर्णय घेतला असून फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.  वार्षिक उत्सवांदरम्यान मंदिरात फटाक्यांची आतीषबाजी करणं हा परंपरेचा एक भाग असल्याने देवस्थान मंडळ फटक्यांवर बंदी घालण्याच्य निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी सांगितले. मात्र असे असले तरी सरकार व न्यायालयाने दिलेले आदेश व पुरेशी सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना करूनच ही आतिषबाजी करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या आतीषबाजीच्या बंदीच्या मुद्यावरून बोर्डाच्या सदस्यांमध्येही मतभेद असल्याचे दिसून आले. 'फटाक्यांच्या आतीषबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी' या निर्णयाचे आपण समर्थन करतो असे मत बोर्डाचे अधिकारी अजय थरायिल यांनी नोंदवले.
दरम्यान त्रावणकोर देवास्वोम बोर्डातर्फे सर्व मंदिरांना तातडीने एक पत्रक पाठवण्यात आले असून सर्व अटी व नियमांचे पालन करूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 
रविवारी पहाटे कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला तर २००हून अधिक भाविक जखमी झाले. नवरात्रोस्तवामुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती, त्यावेळी ही आग दुर्घटना घडली आणि अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या अग्नीतांडवाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आतीषबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतीषबाजी केली गेली.
पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला. स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले.