शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

By admin | Updated: December 23, 2016 08:57 IST

डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - भारतात कॅशलेस आर्थिक व्यवहार नियमित होण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे सर्वात चांगला इंटरनेट स्पीड आणि उत्तर सायबर सुरक्षा. नोटाबंदीमुळे सध्या डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. डाऊनलोड स्पीडमध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे आहोत. सायबर हल्ल्यांमध्ये मात्र आपण वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर सहज डल्ला मारला जात आहे. 
 
(मुंबई, ठाणे आणि पुण्यात इंटरनेटवर सायबर हल्ला)
 
भारतामधील या परिस्थितीमुळे युझर्स आणि एक्स्पर्ट्स दोघेही चिंतेत आहेत. सायबर एक्स्पर्ट्सच्या म्हणण्याप्रमाणे 'भारतातील लोक सायबर व्यवहार करायला घाबरतात. कारण यामध्ये हॅकिंग होऊन आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची भीती असते. आणि अशावेळी बँक आणि पोलीस मात्र कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवत असतात',. सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी 'आपल्यासारखी व्यक्तिदेखील ऑनलाइन व्यवहार करताना घाबरते', असं सांगितलं आहे.
 
(इंटरनेट स्पीड मोजणारे अ‍ॅप)
 
सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व्हावा यासाठी सरकारकडूनच काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सायबर हल्ल्यांविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा भारताचा सहावा क्रमांक लागतो. फक्त एका वर्षात सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत. 
 
बॅण्डविड्थ उपलब्धतेबद्दल बोलायचं गेल्यास श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांच्यासह अनेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. सायबर तज्ञांनी डिजीटल व्यवहाराचं स्वागत केलं आहे, मात्र आयटीला मिळणा-या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 
 
'कार्डद्वारे व्यवहार केला जातो तेव्हा कोणीही आपला पिन क्रमांक किंवा ओटीपी कोणाला देऊ नये. लोक बनावट फोन करुन बँक किंवा सुरक्षेच्या कारणास्तव माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कार्ड स्वाईप करताना आपल्यासमोर करत जा', असं नागपूरचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राईम) सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.