शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

"लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:10 IST

विधानसभा निवडणुकांच्या निकालादरम्यान, रविवारी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती

देशातील ४ राज्याच्या निवडणूक निकालानंतर भाजपने देशभर जल्लोष केला आहे. कारण, चारपैकी तीन राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने मोठी कामगिरी केली. राजस्थान आणि छत्तीगड या राज्यात सत्तांतर होऊन भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे, अनेकांना हा निकाल आश्चर्यकारक वाटतो. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही या विजयावर प्रतिक्रिया देताना लोकांना आश्चर्य वाटत असल्याच म्हटलं आहे. तसेच, जनादेशाचा आपण स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे, ती दूर केली पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले. 

विधानसभा निवडणुकांच्या निकालादरम्यान, रविवारी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आणि काँग्रेसला सल्लाही दिला होता. राऊत म्हणाले की, यापुढे काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षात आणि इंडिया आघाडीतील समन्वयाच्याबाबतीत देशभरात नव्याने विचार करण्याची गरज आली आहे. काहीही झालं तरीही इंडिया आघाडी मजबूत राहिलं,  मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढली असती, आपल्या काही सहकाऱ्यांना जर काँग्रेसने मदत केली असती तर आज काँग्रेसची कामगिरी आजपेक्षा चांगली राहिली असती, असं माझ स्पष्ट मत आहे, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज दिल्लीत असताना राऊत यांनी वेगळीच मागणी केली आहे. 

जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पण लोकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निकालानंतर आमच्या, लोकांच्या मनात शंक उपस्थित होत आहे. त्यामुळे, एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा आणि लोकांच्या मनाती शंका दूर करा, असे संजय राऊत यांनी म्हटले. लोकसभा किंवा विधानसभा एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे लोकांना बोलण्याची संधी राहणार नाही. आता, मुंबई महापालिका आणि मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, आम्ही तयार आहोत, असे आव्हानही राऊत यांनी भाजपला दिले आहे. 

विजयानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 नंतरही होत राव्यात. हे जनतेने ठरवावे. पूर्वी एक म्हण होती यथा राजा तथा प्रजा, तशीच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण असावा. पण ते ठरवण्याचा अधिकार राहातो की जातो? असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिनानाथ सभागृह, विलेपार्ले येथील नवनियुक्त शिवसेना नेत्यांच्या सन्मान सोहळ्यात ते शिवसैनिकांशी बोलत होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक