"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:49 IST2025-01-23T13:48:07+5:302025-01-23T13:49:50+5:30

बुधवारी देवघरच्या मोहनपूर परिसरातील चोपामोड येथील एका कार्यक्रमात केशव महतो कमलेश बोलत असताना त्यांची जीभ घसरली.

deoghar jharkhand keshav mahto kamlesh tongue slips calls amit shah congress national president | "अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

मोहनपुर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस देशभरात पदयात्रा आणि सन्मान यात्रा काढत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केशव महतो कमलेश संथाळ परगण्याच्या दौऱ्यावर आहेत.

बुधवारी देवघरच्या मोहनपूर परिसरातील चोपामोड येथील एका कार्यक्रमात केशव महतो कमलेश बोलत असताना त्यांची जीभ घसरली. यावेळी, त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले.

गेल्या वर्षी २६ डिसेंबर रोजी कर्नाटकच्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल बोलताना केशव महतो कमलेश म्हणाले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेण्यात आला की, आज संविधानावर धोक्याची घंटा वाजत आहे. भाजप आणि संघ हल्ला करत आहेत, त्यांच्या विरोधात मोर्चा काढला पाहिजे.

तत्पूर्वी, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोहनपूर ब्लॉक परिसरातील चोपामोड चौकात 'जय बापू-जय भीम-जय संविधान' अभियानाच्या बॅनरखाली चोपामोड बाजारात पदयात्रा काढून सन्मान मोर्चा काढण्यात आला. 

२६ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम
राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार, 'जय बापू-जय भीम-जय संविधान' मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम ३ जानेवारीपासून २६ जानेवारीपर्यंत देश ते ब्लॉक स्तरावर चालवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप इंदूर येथील डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जन्मस्थळी होईल.

Web Title: deoghar jharkhand keshav mahto kamlesh tongue slips calls amit shah congress national president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.