शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 22:04 IST

"आम्ही 10 वर्षात 70 नवीन विमानतळे, 325 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारले. 18 कोटीहून अधिक लोकांना नवीन गॅस कनेक्शन दिले."

Delhi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. आगामी सहाव्या टप्प्यात राजधानीत दिल्लीतील सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी आज(दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका परिसरात सभा घेतली. यावेळी त्यांनी मद्य घोटाळा आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यावरुन आप-काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा असो, भ्रष्टाचाऱ्यांकडून एक एक पैसा वसूल केला जाईल. ज्याने देशाची लूट केली, त्याला ती परत करावीच लागेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतातील जनतेला काँग्रेस मॉडेल आणि भाजप मॉडेलमधील फरक स्पष्टपणे दिसतोय. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या लोकांकडे पुढचा विचार करण्याची वेळ किंवा क्षमता नाही. या लोकांनी 60 वर्षांपासून भारताच्या क्षमतेवर अन्याय केला. मी तर म्हणेन की, या लोकांनी गुन्हेगारी कृत्येच केली आहेत. 140 कोटींचा एवढा मोठा देश, भारताला आवश्यक तेवढा वेग आणि स्केल भारतीय जनता पक्षाचे सरकारच देऊ शकते," असा दावाही त्यांनी यावेळी केला.

यावेळी मोदींनी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ते म्हणाले, "काँग्रेसला दररोज 12 किलोमीटर महामार्ग बांधता आला, तर आमचे सरकारने दररोज सुमारे 30 किलोमीटर महामार्ग बनवत आहे. काँग्रेसला 60 वर्षात जास्तीत जास्त 70 विमानतळ बांधता आले, आम्ही 10 वर्षात 70 नवीन विमानतळ उभारले. काँग्रेसला 60 वर्षांत 380 वैद्यकीय महाविद्यालये बांधता आली, आम्ही अवघ्या 10 वर्षांत 325 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली, काँग्रेसच्या काळात 7 AIIMS होते, आज 22 हून अधिक AIIMS आहेत, काँग्रेसच्या काळात 75 टक्क्यांहून अधिक लोकांकडे नळ कनेक्शन नव्हते, आज 75 टक्के लोकांच्या घरात नळाला पाणी आहे, काँग्रेसने 60 वर्षात 14 कोटींहून कमी गॅस कनेक्शन दिले, आम्ही 10 वर्षात 18 कोटीहून अधिक नवीन गॅस कनेक्शन दिले आहेत." 

यावेळी पंतप्रधानांनी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "काँग्रेसने देशातील एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांचे उच्च शिक्षणातील अधिकार हिरावून घेण्याचे काम केले. काँग्रेसने आपल्या एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांवर किती अन्याय केला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. काँग्रेस सरकारने शांतपणे एक खेळी केली. अचानक जामिया मिलिया विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्था म्हणून घोषित केले, त्यामुळे मुस्लिमांना 50 टक्के आरक्षण लागू झाले," अशी टीका त्यांनी केली.

"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी