शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:39 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुका संपल्यापासून एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक्झिट पोल म्हणजे काय? याची सुरुवात कधी आणि कुठे झाले? आज आम्ही तुम्हाला याच एक्झिट पोलबद्दल सांगणार आहोत. 

एक्झिट पोल म्हणजे काय? तर, एक्झिट पोल हे एक सर्वेक्षण आहे, जे मतदानाच्या दिवशी जाहीर केले जाते. या सर्वेक्षणादरम्यान मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणाला मतदान केले आहे. अशा प्रकारे, कंपन्या डेटाचे विश्लेषण करून कोणाचे सरकार बनवले जात आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याला एक्झिट पोल म्हणतात.

एक्झिट पोल या देशात पहिल्यांदा सुरू झाला?आज भारताशिवाय असे अनेक देशात निवडणुकीपूर्वी आणि नंतर एक्झिट पोल दाखवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का, एक्झिट पोल कोणत्या देशात सर्वात आधी दाखवला गेला? 1936 मध्ये अमेरिकेत पहिला एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्कमध्ये सर्वेक्षण केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी मतदान केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारण्यात आले की, त्यांनी अध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या एक्झिट पोलमध्ये फ्रँकलिन डी. रुझवेल्ट विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो निवडणूक निकालात खरा ठरला. यानंतर, एक्झिट पोलचा ट्रेंड जगभरात वेगाने पसरला. माहितीनुसार, यानंतर ब्रिटनमध्ये 1937 मध्ये आणि फ्रान्समध्ये 1938 मध्ये पहिले एक्झिट पोल घेण्यात आले.

भारतातील पहिला एक्झिट पोल कधी घेतला?भारतात पहिला एक्झिट पोल कधी आला? 1957 मध्ये दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात पहिल्यांदाच एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हे सर्वेक्षण केले होते. पण, त्याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हटले गेले नाही. यानंतर 1980 मध्ये डॉ. प्रणय रॉय यांनी पहिला एक्झिट पोल काढला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलची बरीच चर्चा झाली होती. कारण त्यावेळी दूरदर्शनवर एक्झिट पोल दाखवण्यात आले होते.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निवडणुकीत एक्झिट पोलने मताधिक्य तुटण्याची शक्यता वर्तवली होती. पुढेही असाच प्रकार घडला. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, पण बहुमतापासून दूर होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण बहुमत नसल्यामुळे त्यांना 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीElectionनिवडणूक 2024