शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सायबर, लेझर, स्पेस आणि रोबो; लष्करप्रमुखांनी सांगितली भविष्यामधील युद्धातील अस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:42 IST

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत  विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत.

नवी दिल्ली -  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत  विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशाचे लष्करप्रमुख बीपीन रावत यांनी डीआरडीओमधील एका कार्यक्रमात बोलताना भविष्यातील संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कराकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. ''आता आमची नजर भविष्यातील युद्धात उपयुक्त ठरेल, अशी प्रणाली विकसित करण्यावर आहे,'' असे रावत यांनी सांगितले.  बीपीन रावत म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सायबर, स्पेस, लेझर, इलेक्ट्रॉनिक आणि रोबोटिक टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. डीआरडीओने देशासाठी खूप असे काम केले आहे, ज्यामुळे लष्कराला खूप फायदा झाला आहे.'' ''आता आम्ही यापुढे जेव्हा कधी पुढील लढाई लढू तेव्हा त्यात विजयी ठरू, याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा विजय स्वदेशी हत्यारांच्या बळावर मिळेल,'' असेही लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्दा तंत्रज्ञानावर आघारित होणाऱ्या भविष्यातील लढायांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाला तयार राहावे लागेल, असे वारंवार सांगितले आहे.   यावेळी नौदलप्रमुख कमरबीर सिंह यांनी सांगितले की, ''आता आपल्याला तीन बाबतीं काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. आपल्याल तंत्रज्ञानाचा खूप वापर करावा लागेल. सोबतच अमेरिका कशाप्रकारे आगेकूच करत आहे, कुठल्या प्रकल्पांवर काम करत आहे त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्याबरोबरच डीआरडीओने लवकर तयार होऊ शकतील, अशी छोटी शस्त्रास्त्रे विकसित करावीत.''  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानwarयुद्धIndiaभारतDRDOडीआरडीओ