शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

CoronaVirus Live Updates : दिलासादायक! उत्तर प्रदेशमधील 33 जिल्हे झाले कोरोनामुक्त; 67 जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 10:24 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे केवळ 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 67 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. राज्यातील तब्बल 33 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे केवळ 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 67 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या दरम्यान 16 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 33 जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नसून हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 33 जिल्हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये अलिगड, अमरोहा, अयोध्या, बागपत, बलिया, बलरामपूर, बांदा, बस्ती, बहराइच, भदोही, बिजनौर, चंदौली, चित्रकूट, देवरिया, एटा, फतेहपूर, गाझीपूर, गोंडा, हमीरपूर, हापूर, हरदोई, हाथरस, कासगंज, कौशांबी, ललितपूर, महोबा, मुरादाबाद, मुझफ्फरनगर, पीलीभीत, रामपूर, शामली, सिद्धार्थनगर आणि सोनभद्र यांचा समावेश आहे. राज्याचा पॉझिटिव्ह दर 0.01 पेक्षा कमी झाला आहे आणि रिकव्हरी दर 98.7 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल सात कोटी 44 लाख 95 हजार 406 कोरोना सँपलची तपासणी करण्यात आली आहे.

33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही सक्रिय रुग्ण नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्यवस्थापनासाठी गठित केलेल्या टीमशी झालेल्या बैठकीत सांगितले की, अग्रेसिव्ह ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लगेचच ट्रीटमेंट असे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर प्रभावी नियंत्रण असताना परिस्थिती सामान्य होत आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील परिस्थिती बरी आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही सक्रिय प्रकरण नाही. दररोज सरासरी अडीच लाख कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी लसीचा किमान एक डोस दिला घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नसून केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. भारतात येऊन गेलेली कोरोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हायरसमुळेच आली होती. त्यामुळे अनेकांना डेल्टाची लागण होऊन गेली असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं मत डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे. भारतीयांना आता डेल्टा व्हायरसची फारशी भीती नसून जर कुठलाही नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेची फारशी भीती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतीयांच्या शरीरात या व्हायरसविरोधात अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस