शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हा देश संघाच्या विचारांचा कधीच बनू शकणार नाही -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:32 AM

हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही.

नवी दिल्ली : हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही. कारण गांधीजींचे विचार हाच या देशाचा भक्कम पाया आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी केले.गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. केवळ आपल्यालाच सारे काही कळते, असे समजणाऱ्यांना महात्मा गांधी काय समजणार, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. भारताची गेल्या पाच वर्षांतील स्थिती पाहून गांधीजींनाही दु:ख झाले असते, असेही त्या म्हणाल्या.महात्मा गांधींचे नाव आज अनेक जण घेत आहेत; पण त्यांच्या मार्गाने चालणे अवघड आहे, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राहुल गांधी, नरसिंह राव व डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले; पण आज देशातील तरुण बेरोजगार आहेत, महिला असुरक्षित आहेत. काही जण आता साम- दाम- दंड- भेदाचा वापर करून स्वत:ला शक्तिशाली समजू लागले आहेत.

महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग सोडून अन्य रस्त्याने जाणारे याआधीही अनेक झाले; पण तरीही आपला देश भरकटला नाही. गांधीजींचे विचार आजही जिवंत असल्याचे ते उदाहरण आहे. त्यामुळे अनेक येतील आणि जातील. ते वाटेल त्या मार्गाने जातील; पण हा देश गांधीजींनाच कायम मानत राहील, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.सत्य आणि सत्ताअसत्यावर आधारित राजकारण करणाऱ्यांना गांधीजींचे सत्याचे राजकारण कधीही समजणार नाही. सत्तेसाठी आता काहीही करू पाहणाºयांना गांधीजींचा अहिंसेचा विचार समजणार नाही. सत्ता मिळताच आपण सर्वेसर्वा आहोत, असे समजू लागणाºयांना गांधीजींचा नि:स्वार्थ कळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ