शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कधी आणि कसं हटवायचं लॉकडाऊन? फिक्कीने सरकारला दिला हा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:01 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

ठळक मुद्देदेशातील लॉकडाऊन हळूहळू हटवण्यात यावे, तसेच आयटी कंपन्या आणि शाळा सद्यस्थितीत बंद ठेवाव्यात कोरोनामुक्त जिल्ह्यांपासून लॉकडाऊन हटवण्याची सुरुवात करण्यात यावीरस्ते वाहतुकीला नियमांनुसार परवानगी देण्यात यावी. त्याबरोबरच रेल्वेसेवासुद्धा मर्यादित स्वरूपात सुरू करावी

मुंबई - एकीकडे देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर फिक्कीने देशातील लॉकडाऊन कधी आणि कशाप्रकारे हटवण्यात यावे याबाबत सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही भारतातील उद्योग आणि व्यवसायांचे हितसंबंध जपणारी संस्था आहे. देशातील लॉकडाऊन हळूहळू हटवण्यात यावे, तसेच आयटी कंपन्या आणि शाळा सद्यस्थितीत बंद ठेवाव्यात असे फिक्कीने म्हटले आहे. कामगारांना 15 एप्रिलपासून कामावर बोलावण्यात यावे. तसेच त्यांना कामावर येण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनामुक्त जिल्ह्यांपासून लॉकडाऊन हटवण्याची सुरुवात करण्यात यावी. रिटेल स्टोअर्सना अंशतः उघडण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच ई-कॉमर्स कंपन्या आणि देशांतर्गत उड्डाणांना अंशतः परवानगी देण्यात यावी. 

रस्ते वाहतुकीला नियमांनुसार परवानगी देण्यात यावी. त्याबरोबरच रेल्वेसेवासुद्धा मर्यादित स्वरूपात सुरू करावी, असा प्रस्ताव फिक्कीने दिला आहे. मात्र शाळा आणि आयटीप्रमाणेच देशातील छोट्या आणि मोठ्या हॉटेलमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावे, असेही फिक्कीने म्हटले आहे. 

संपूर्ण देशात मालवाहतुकीस परवानगी मिळाली पाहिजे. तसेच अत्यावश्यक साधनांच्या वाहतुकीसाठी लष्कराची मदत घेण्यात यावी. कोरोनामुक्त जिल्ह्यांत उत्पादन आणि वितरण सुरू व्हावे, सुरुवातीच्या काळात 22 ते 39 या वयोगटातील सुदृढ लोकांनी काम करावे. तसेच आजारी आणि ज्येष्ठ यांना सुदृढ कर्मचाऱ्यांपासून दूर ठेवावे. 

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा वाढवाव्यात. त्याबरोबरच कोरोना प्रभावित भागांना उच्च, मध्यम आणि कमी धोका असलेल्या भागांमध्ये विभाजित करण्यात यावे. मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण व्हावे आणि संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी व्हावी, अशी शिफारस फिक्कीने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायGovernmentसरकार