शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

Coronavirus: गुड न्यूज; देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, केंद्राने दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:05 PM

जेव्हा कधी या आजारावर लस तयार केली जाईल ती भविष्यात फायदेशीर ठरेल असं आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी सांगितले.

नवी दिल्ली – देशात आतापर्यंत १३ हजार ३८७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यांची संक्या ३ हजार २०२ इतकी आहे तसेच १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ६४० रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढून १३ हजार ३८७ झाली आहे. तर ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात कोरोनामुळे २३ लोक मरण पावले आहेत. पण देशात कोरोना प्रकरणात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांपैकी १३.६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ८० टक्के रुग्ण बरे आहेत. परंतु देशासाठी एकही मृत्यू ही चिंतेची बाब आहे. आपल्याला प्रत्येक आघाडीवर कोरोनाशी लढायचं आहे. आमचा प्रयत्न जोरात सुरु आहे. देशात अँटीबॉडीजवर काम चालू आहे. प्लाझ्मा टेक्निकल उपचारांवर काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच आमचं सर्व लक्ष लवकरात लवकर कोरोनावर लस विकसित करण्यावर आहे. सध्या कोविड १९ शी लढण्यासाठी पुनर्संचयित बीसीजी , उत्कृष्ठ प्लाझ्मा थेरपी, मोनोक्लोनल अँन्टीबॉडीजवर काम करत आहोत. मे महिन्यापर्यंत देशभरात दहा लाख आरटीपीसीआर किट बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. कोविड रुग्णांचे बरे होणे आणि मृत्यूदर यांचे प्रमाण ८०:२० इतके आहे. जे इतर देशांपेक्षा जास्त आहे असंही लव अग्रवाल यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना व्हायरस भारतात ३ महिन्यांसाठी आहे. त्याचं उत्परिवर्तन फार लवकर होत नाही. जेव्हा कधी या आजारावर लस तयार केली जाईल ती भविष्यात फायदेशीर ठरेल असं आयसीएमआरचे डॉक्टर रमन गंगाखेडकर यांनी सांगितले. त्याचसोबत कोरोनाशी लढा देण्यासाठी बीसीजी लस वापरण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारता असता ते म्हणाले की, पुढील आठवड्यापासून आयसीएमआर यावर अभ्यास सुरू करेल. जोपर्यंत आमच्याकडे यासंदर्भात निश्चित माहिती उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आरोग्य कर्मचार्‍यांनाही याची शिफारस करणार नाही असं डॉक्टर गंगाखेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या