शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Coronavirus: महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी कोरोना नुकसान भरपाईची माहिती दिली नाही, सर्वोच्च न्यायालयाची फटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 1:39 PM

Maharashtra News: कोरोनाने मरण पावलेल्यांच्या किती वारसदारांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यातील किती लोकांना भरपाई दिली, याबद्दलची कोणतीही माहिती महाराष्ट्रासह नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारला अद्याप दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या किती वारसदारांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यातील किती लोकांना भरपाई दिली, याबद्दलची कोणतीही माहिती महाराष्ट्रासह नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारला अद्याप दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच देशभरात अशा वारसदारांपैकी खूपच कमी लोकांना भरपाई मिळाली असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने  चिंता व्यक्त केली.

कोरोना मृतांच्या वारसदारांपैकी किती लोकांनी भरपाईसाठी अर्ज केले, त्यापैकी किती जणांना भरपाई दिली, याची माहिती केंद्र सरकारला न देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, झारखंड,  सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख यांचा समावेश आहे.

या भरपाई योजनेची राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. आर. शहा व न्या. बी. एन. नागरत्न यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांना दिला. कोरोना मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई देण्यात येेते. प्रत्येक राज्यात कोरोनामुळे किती मृत्यू झाले, त्यांच्यापैकी किती जणांच्या वारसदारांना भरपाई देण्यात आली, याचा अहवाल राज्यांनी सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.  

ऑनलाइन पोर्टल सुरू करावेया प्रकरणी वकील कुमार बन्सल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई देण्यासाठी गुजरात सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भरपाईसाठी वारसदाराने दावा करण्याची पद्धत सोपी हवी. प्रत्येक राज्यात कोरोना मृतांच्या वारसदारांपैकी भरपाईसाठी अर्ज केलेल्या लोकांची संख्या कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय