शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसने केलं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं कौतुक, अशी दिली कामाची पोचपावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:45 IST

श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

मुंबई - स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच ही वेळ टीका-टिप्पणीची नाही, असेही म्हटले आहे.

राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सध्या देशभरात रेल्वेगा्ड्या सोडण्यासाठी दबाव आहे. त्यांच्या प्रयत्नांची दाद देऊन सन्मान केला पाहिजे. मजुरांना घरी जाण्यासाठी ते ट्रेन उपलब्ध करून देत आहेत. त्याचे कौतुक झाले पाहिजे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेमंत्र्यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये रंगलेले ट्विटर युद्ध चांगलेच पेटले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. यादी कसली मागताय? तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात, हे विसरू नका अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री  पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली  

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "१४ मे २०ला सुटलेल्या  नागपुर - उधमपूर ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले. कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका." असेही राऊत यांनी गोयल यांना सुनावले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल