शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 09:08 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली -  देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. 1 जूनपासून दररोज 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. तसेच  मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान अनेक मजुरांचा हा वेगवेगळ्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र रेल्वे प्रवासातही मजुरांचा मृत्यू होत आहे. प्रवासादरम्यान अन्नपाण्यावाचून आणि उष्णतेमुळे मजुरांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या तब्बल सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. कोरोनाशी सामना करण्यापूर्वीच अन्नपाण्याची कमतरता आणि वाढता उन्हाळा यामुळे मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सोमवारी 'या' प्रवासी मजुरांचा झाला मृत्यू

- पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी इरशाद यांचा मुजफ्फरपूर जंक्शन येथे मृत्यू.

- 55 वर्षीय अनवर यांचा बैरोनी येथे मृत्यू झाला. मुंबईतून सुरू केला होता प्रवास

- सूरतहून येणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा सासाराम स्टेशनवर मृत्यू

- महाराष्ट्रातून येणाऱ्या मोतिहारीच्या मजुराचा जहानाबादमध्ये मृत्यू

- मुंबईहून सीतामढीला निघालेल्या कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाचा कानपूरमध्ये मृत्यू

- अहमदाबादहून कटिहारला जाणाऱ्या अलवीनाचा रेल्वे प्रवासात मृत्यू

प्रवासी मजुरांच्या मृत्यूवर रेल्वे अधिकारी म्हणतात...

रेल्वेला होणारा विलंब आणि रेल्वेतील अन्नपाणी सुविधेबाबत पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही मजुराचा भूकेमुळे मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातील काही मजुरांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांना सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत रेल्वेतर्फे वेळेवर जेवण दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

निरनिराळ्या स्टेशनांवर यासाठी फूड सेंटर उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर येते, तेव्हा रेल्वेतील सर्वांना अन्न-पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक रेल्वे या बऱ्यापैकी वेळेवर धावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतीही रेल्वे ही पाच किंवा सात दिवसांच्या उशिराने धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेDeathमृत्यूIndiaभारतhospitalहॉस्पिटल