शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 20:24 IST

'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही - आनंद शर्माशर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहेहे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून देशाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार या आर्थिक पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसचे वरिष्‍ठ नेते आनंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त करत, देशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही, असे म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

शर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहे. याला प्रोत्साहन पॅकेज म्हटले जाऊ शकत नाही. तसेच काँग्रेसने पुन्हा एकदा दावा केला, की केंद्राने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये देशातील मजूर आणि शहरातील गरीब जनतेसाठी काहीही नाही. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपायांच्या विशेष पॅकेजवर हल्ला करत आनंद शर्मा म्हणाले, हे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

आणखी वाचा -CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

अर्थमंत्र्यांना चॅलेन्ज -'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

स्थलांतरित मजुरांवर उपस्थित केला प्रश्न -सरकारच्या नियोजनातील आभावामुळे, रस्त्यावर पायी चालत असलेल्या स्थलांतरित मजुरांसंदर्भातही सरकारने देशाला उत्तर द्यायला हवे. एवढेच नाही, तर देशाला अर्थमंत्र्यांकडून गांभीर्याची अपेक्षा आहे, असेही शर्मा म्हणाले.

आणखी वाचा - CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला होता काँग्रेसवर निशाणा -यापूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करत त्यांनी, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी यावरून राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असे म्हटले होते.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीBJPभाजपा