शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 20:24 IST

'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही - आनंद शर्माशर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहेहे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून देशाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार या आर्थिक पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसचे वरिष्‍ठ नेते आनंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त करत, देशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही, असे म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

शर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहे. याला प्रोत्साहन पॅकेज म्हटले जाऊ शकत नाही. तसेच काँग्रेसने पुन्हा एकदा दावा केला, की केंद्राने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये देशातील मजूर आणि शहरातील गरीब जनतेसाठी काहीही नाही. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपायांच्या विशेष पॅकेजवर हल्ला करत आनंद शर्मा म्हणाले, हे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

आणखी वाचा -CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

अर्थमंत्र्यांना चॅलेन्ज -'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

स्थलांतरित मजुरांवर उपस्थित केला प्रश्न -सरकारच्या नियोजनातील आभावामुळे, रस्त्यावर पायी चालत असलेल्या स्थलांतरित मजुरांसंदर्भातही सरकारने देशाला उत्तर द्यायला हवे. एवढेच नाही, तर देशाला अर्थमंत्र्यांकडून गांभीर्याची अपेक्षा आहे, असेही शर्मा म्हणाले.

आणखी वाचा - CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला होता काँग्रेसवर निशाणा -यापूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करत त्यांनी, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी यावरून राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असे म्हटले होते.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीBJPभाजपा