शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका; 'त्या' अहवालानं वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 15:13 IST

CoronaVirus सामुहिक संसर्गाचा धोका वाढल्यानं कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली: चीनमधील जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूनं भारतातही थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १९९ इतका झाला आहे. कोरोनाचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनं याबद्दलचे संकेत दिले आहेत. देशातील कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका वाढल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून आयसीएमआरनं विविध जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांचे नमुने आणि त्यांची पार्श्वभूमी याबद्दलची माहिती गोळा केली. यातील आकडेवारीचा अभ्यास करून आयसीएमआरनं धोक्याचा इशारा दिला आहे. देशात सामुहिक संसर्गाचा धोका वेगानं वाढत असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरनं देशात सामुहिक संसर्गाचा धोका जवळपास नसल्याचं म्हटलं होतं.

आयसीएमआरनं १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान देशात आढळून आलेल्या ५ हजार ९११ कोरोना संक्रमितांचा अभ्यास केला. यातील १०४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे रुग्ण २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५२ जिल्ह्यांमधले होते. १०४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४० जणांनी कधीही परदेश प्रवास केलेला नव्हता. याशिवाय ते परदेशातून आलेल्या कोणाच्याही संपर्कात आले नव्हते. त्यामुळे कोरोनाचं संकट तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.  
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या