शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

Coronavirus : 'शिंका आणि कोरोना पसरवा' म्हणणाऱ्या इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक झाली, नोकरीही गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:59 IST

Coronavirus : कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला त्याला अटकही करण्यात आली आहे.

नवी दिल्ली जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 27,365 लोकांचा मृत्यू झाला असून 597,267 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 133,363 लोक बरे झाले आहेत. भारतात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला  आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खळबळजनक पोस्ट केली आहे.

इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने कोरोना पसरवूया अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने लोकांना घराबाहेर पडा आणि शिंका असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. इन्फोसिसने याप्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर कारवाई केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चला, बाहेर या आणि मोकळ्या जागेत शिंका आणि कोरोना पसरवाअसं म्हटलं आहे. लोकांना कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी भडकवणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आल्याची माहिती बंगळुरूतील पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्फोसिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून इंजिनिअरला कामावरून काढून टाकत असल्याची माहिती दिली आहे. इंजिनिअरने केलेली सोशल मीडिया पोस्ट इन्फोसिसच्या आचारसंहिता आणि समाजाप्रती त्याच्या बांधिलकीच्या विरोधात आहेअसं ही कंपनीने म्हटलं आहे.

भारतात शुक्रवारी (मार्च) आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत नवीन 75 रुग्ण आढळले. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहेही चिंताजनक बाब आहे. याच दरम्यान तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात आहे. या अपघातातजणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसFacebookफेसबुकArrestअटकInfosysइन्फोसिस