शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भारतात कोरोनाच्या फैलावाने सर्वोच्च पातळी गाठलीय? एम्सच्या संचालकांनी दिली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 09:33 IST

देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देदेशातील काही भागात कोरोनाने आपलं सर्वोच्च शिखर गाठले आहेमुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यताकाही राज्यांमध्ये आताच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, अशा राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वोच्च स्तर काहीसा उशिरा येण्याची शक्यता

नवी दिल्ली - देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत देशभरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी भारतातील कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

 देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशातील काही भागात कोरोनाने आपलं सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या परिस्थितीवरून आपण म्हणू शकतो. मुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर येथील साथीचा आलेख आता काहीसा खाली येऊ लागला आहे. तसेच देशातील इतर भागातही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये आताच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, अशा राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वोच्च स्तर काहीसा उशिरा येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारतासोबतच मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे जे इटली आणि स्पेनमध्ये घडले, तसेच जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, ज्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर भारतात कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीबाबत भाष्य करताना गुलेरिया म्हणाले की, कोरोनाविरोधात विकसित होणारी लस आपल्याला कोरोनाच्या संसर्गापासून एक ते दोन वर्षांपर्यंत संरक्षण देऊ शकते. मात्र ही लस सर्वात आधी कुणाला द्यायची, याबाबतचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवावा लागेल. वृद्ध व्यक्ती, तसेच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस आधी दिली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMedicalवैद्यकीय