शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

Coronavirus: ...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:24 IST

Uddhav Thackeray: अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची घोषणा न झाल्याने राजकीय संकटात अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन विनंती केली आहे.

ठळक मुद्देआमदारकीचा पेच सुटत नसल्याने उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन जर ते झालं नाही तर राजीनामा द्यावा लागेल - उद्धव ठाकरेमी प्रकरणात लक्ष घालतो, पंतप्रधानांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन

मुंबई – राज्यात एकीकडे सत्ताधारी कोरोनाशी लढाई देत असताना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मुद्दाही गाजत आहे. येत्या २८ मे पर्यंत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक आहे. पण कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने हा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

मात्र उद्धव ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त असलेल्या २ जागा सध्या रिक्त आहेत. रामराव वडकुते आणि राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेतील त्यांच्या जागा रिक्त आहेत. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करावी अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. याबाबत महाविकास आघाडीचे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

पण अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीची घोषणा न झाल्याने राजकीय संकटात अडकलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन विनंती केली आहे. या राजकीय पेचाप्रसंगी नरेंद्र मोदींनी मदत करावी, जर ते झालं नाही तर मला राजीनामा द्यावा लागेल असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले त्यानंतर मोदींनीही संबंधित प्रकरणात लक्ष घालून माहिती मागवतो असं आश्वासन उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्रांनी एएनआयला दिली आहे.

तसेच विधान परिषद नियुक्तीवरुन ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे ते राज्यातील प्रशासनाला आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला नाउमेद करणारे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची आहे, मात्र दुर्दैवाने जी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे त्यावरून आपल्याला चिंता वाटत असल्याचेही ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचे समजते.

दरम्यान, याविषयी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात कोरोना त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सातत्याने चर्चा होत आहे. चारवेळा दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सही झाली. तसेच गृहमंत्री अमित शहा हे देखील ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले आहेत. त्यामुळे त्याचा लगेच असा अर्थ काढणे योग्य होईल असे वाटत नाही. बोलणे झाले की नाही हे ते दोघेच सांगू शकतील असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

अन्य बातम्या

मोदी यांच्याशी चर्चेनंतर उद्धव यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा?

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचना

यात कसलं आलंय डोंबलाचं राजकारण!; साधुंच्या हत्येवरून शिवसेनेचं योगींना प्रत्युत्तर

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्री