शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

नरेंद्र मोदी सरकारवर संघाचे नियंत्रण

By admin | Updated: May 24, 2015 02:16 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रगतीचे मोठे परिणाम दिसत नसले तरी लोकांना या सरकारकडून असलेल्या अपेक्षा अजूनही कायम आहेत. ‘लोकमत समूह’ने केलेल्या दोन राज्यांतील सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.अमिताभ श्रीवास्तव ल्ल मुंबईअनेक वेळा हो-नाही करीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नियंत्रण असल्याचे जाणवते. नागपूरच्या सततच्या दौऱ्यांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे फारसे लक्ष नाही. त्यामुळे लोक सरकारवर नाराज आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त ‘लोकमत’ समूहाने महाराष्ट्र आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मोदी सरकारच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारबाबत निवडणूक आणि त्यानंतरच्या परिस्थितीवरील लोकभावना अगदी स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. देशात महागाई कमी झालेली नाही, ‘अच्छे दिन’ अजूनही दूरच आहेत; पण लोकांची आशा अजूनही नष्ट झालेली नाही. गेल्या वर्षभरात मोदी सरकारची कामगिरी फार वाईट नसली, तरी चांगलीदेखील नसल्याचे लोकांना वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, हे मोदी सरकारचे अपयशच मानले जात आहे. शेतकऱ्यांशी संबंधित आणि नुकतेच विरोधी पक्षांकडून टीकेचे धनी झालेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला लोक मोदी सरकारचे सगळ्यात मोठे अपयश मानतात. काळा पैसा देशात आणणे आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता या आश्वासनांपेक्षाही जमीन अधिग्रहणासंदर्भातील सरकारचे अपयश फार मोठे समजले जाते.सरकारच्या अपयशाबद्दल लोकभावना संमिश्र असल्या तरी मोदी सरकारची लोकप्रियता मात्र कायम आहे. मोदी यांची सगळ्यात पहिली महत्त्वाकांक्षी मोहीम ‘स्वच्छता अभियान’ लोकांना खूप आवडली; परंतु सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले नियंत्रण आणि संघाच्या आदेशाचे सरकारकडून होणारे पालन हेदेखील लोकांच्या नजरेतून सुटले नाही. दुसरीकडे मोदी सरकारचे झुकते माप स्पष्टपणे उद्योग-व्यापार क्षेत्राला असल्याचे दिसून येते. असे असले तरी उद्योग क्षेत्रातीलच एक गट सरकारवर टीकाही करतो आहे. सर्वेक्षणात सत्ताधारी खासदारांबद्दल लोकभावना चांगली नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते योग्यरीत्या काम करीत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे; परंतु सोशल मीडियावर सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तारीफही होत आहे. हे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात १३ ठिकाणी केले गेले. त्यात वेगवेगळ्या वयोगटांतील, व्यवसाय, उद्योगातील स्त्री-पुरुषांचा समावेश होता.