शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

नरेंद्र मोदी सरकारवर संघाचे नियंत्रण

By admin | Updated: May 24, 2015 02:16 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील जनता फार असमाधानी नाही. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रगतीचे मोठे परिणाम दिसत नसले तरी लोकांना या सरकारकडून असलेल्या अपेक्षा अजूनही कायम आहेत. ‘लोकमत समूह’ने केलेल्या दोन राज्यांतील सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.अमिताभ श्रीवास्तव ल्ल मुंबईअनेक वेळा हो-नाही करीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नियंत्रण असल्याचे जाणवते. नागपूरच्या सततच्या दौऱ्यांमुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे फारसे लक्ष नाही. त्यामुळे लोक सरकारवर नाराज आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारला मंगळवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त ‘लोकमत’ समूहाने महाराष्ट्र आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. मोदी सरकारच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि गोव्यात केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारबाबत निवडणूक आणि त्यानंतरच्या परिस्थितीवरील लोकभावना अगदी स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. देशात महागाई कमी झालेली नाही, ‘अच्छे दिन’ अजूनही दूरच आहेत; पण लोकांची आशा अजूनही नष्ट झालेली नाही. गेल्या वर्षभरात मोदी सरकारची कामगिरी फार वाईट नसली, तरी चांगलीदेखील नसल्याचे लोकांना वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, हे मोदी सरकारचे अपयशच मानले जात आहे. शेतकऱ्यांशी संबंधित आणि नुकतेच विरोधी पक्षांकडून टीकेचे धनी झालेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला लोक मोदी सरकारचे सगळ्यात मोठे अपयश मानतात. काळा पैसा देशात आणणे आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता या आश्वासनांपेक्षाही जमीन अधिग्रहणासंदर्भातील सरकारचे अपयश फार मोठे समजले जाते.सरकारच्या अपयशाबद्दल लोकभावना संमिश्र असल्या तरी मोदी सरकारची लोकप्रियता मात्र कायम आहे. मोदी यांची सगळ्यात पहिली महत्त्वाकांक्षी मोहीम ‘स्वच्छता अभियान’ लोकांना खूप आवडली; परंतु सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले नियंत्रण आणि संघाच्या आदेशाचे सरकारकडून होणारे पालन हेदेखील लोकांच्या नजरेतून सुटले नाही. दुसरीकडे मोदी सरकारचे झुकते माप स्पष्टपणे उद्योग-व्यापार क्षेत्राला असल्याचे दिसून येते. असे असले तरी उद्योग क्षेत्रातीलच एक गट सरकारवर टीकाही करतो आहे. सर्वेक्षणात सत्ताधारी खासदारांबद्दल लोकभावना चांगली नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते योग्यरीत्या काम करीत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे; परंतु सोशल मीडियावर सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तारीफही होत आहे. हे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात १३ ठिकाणी केले गेले. त्यात वेगवेगळ्या वयोगटांतील, व्यवसाय, उद्योगातील स्त्री-पुरुषांचा समावेश होता.