शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- कर्नाटकात ११ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक टाळल्यास अथवा पुढे ढकलल्यास घोडेबाजाराला उघड उत्तेजन मिळेल, अशी तक्रार घेऊन दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. भाजपा व जनता दल (सेक्युलर)ने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत. काँग्रेसने जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस आणि के. सी. राममूर्ती, तर भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि जद (से) ने बी. एम. फारूक यांना उमेदवारी दिली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ४५ मते हवीत. विधानसभाध्यक्ष वगळता काँग्रेसकडे १२२ मते आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयासाठी पक्षाची ३२ अधिकृत मते मिळाल्यावर आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी १ अपक्ष व जद (से) च्या ५ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची माहिती हाती आहे.कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत धनशक्तीचा वापर कसा होतो आहे, या संबंधी एका वृत्तवाहिनीने नुकतेच एक स्टिंग आॅपरेशन प्रसारित केले. यानंतर, घोडेबाजाराला घाबरलेल्या काँग्रेसने सुरक्षिततेचा उपाय म्हणून अपक्ष आमदार अशोक खेनीसह यशवंतपूरचे आमदार सोमाशेखर यांच्या नेतृत्वाखाली १४ आमदार मुंबईला रवाना केले. या आमदारांचा मुक्काम सध्या मुंबईच्या जेडब्लू मॅरियट हॉटेलात आहे. हे आमदार १0 जून रोजी बंगलुरूला परतणार असून, ११ जून रोजी मतदानात भाग घेतील. त्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलू नये व मतदान नियोजित वेळीच व्हावे, या मागणीसाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले.>विधानसभेतले पक्षीय संख्याबळकर्नाटक विधानसभेत काँग्रेस १२३, भाजपा ४४, जद (से) ४0, अपक्ष ९, अन्य छोटे पक्ष ७ व नामनियुक्त १ अशा २२५ सदस्यांचे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला १३, भाजपाला १ तर जद(से)उमेदवाराला १0 मतांची गरज आहे. सर्व पक्षांची नजर अपक्ष ९, अन्य पक्षांच्या ७ आमदारांवर आहे. अशा वातावरणात घोडेबाजाराला उत्तेजन मिळू नये, यासाठी काँग्रेसने १४ आमदारांना मुंबईला हलवले, तर भाजपाने ही निवडणूकच पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.