शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला जातात, मग मणिपूरमध्ये का नाही?; मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:14 IST

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन ठिकाणी जाऊन फोटोशूट करतात. मात्र मणिपूरमध्ये का जात नाही?, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

तुम्ही लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकतात, पण मणिपूरमध्ये जाऊन जनतेला समजावू शकत नाहीत? मणिपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, पण तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान मोदी समुद्रकिनारी गेले. पोहताना फोटो सेशन केले. पंतप्रधान सगळीकडे फिरत आहेत. मात्र मणिपूरमध्ये ते गेले नाहीत, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तसेच गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी खासदारांच्या निलंबनावर खर्गे म्हणाले, 'जे खासदार गप्प बसले, त्यांच्यावरही कारवाई झाली. विरोधी पक्षांना संसदेत आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही.

खर्गे यांनी आज पत्रकार परिषदेत 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या लोगोचे प्रकाशन केले. यावेळी खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा हे देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहोत जेणेकरून आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकता येईल आणि आमचे विचार मांडता येतील. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे राहुल गांधींनी काढलेल्या या यात्रेची सुरुवात मणिपूरची राजधानी इंफाळ येथून होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस