शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:28 AM

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केल्या अनेक शिफारसी

मुंबई : पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम या तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव का झाला? यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्लीत पाठवला आहे. गेले काही दिवस सातत्याने ते या तीनही राज्यातील विविध नेत्यांशी चर्चा करत होते. पश्चिम बंगालचा अहवाल अद्याप दिलेला नाही. या अहवालात पक्षसंघटना मजबूत करणे व निवडणूक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शिफारसी करण्यात आल्या आहेत.देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्थापन केली होती. समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य होते. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या समितीने या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून १५ दिवसांत अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार चव्हाण यांनी तीनही राज्यातील पक्ष संघटनेच्या विविध नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत जिंकलेले आणि पराभूत झालेले उमेदवार, संघटनेचे विविध नेते, तिकीट देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीचे अध्यक्ष यांच्यासह समितीच्या पाचही सदस्यांनी दररोज किमान ५-६ तास वेळ देऊन संबंधित राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आदींशी विस्तृत चर्चा केली. तीन राज्यातील सुमारे दीडशे व्यक्तींशी चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान संकलित झालेल्या माहितीच्या आधारे समितीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची कारणमीमांसा केली, काही निष्कर्ष काढले व त्याआधारे पक्षाला काही शिफारसी केल्या. याबाबत समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. हा अहवाल काँग्रेस पक्षाची संपत्ती असल्याने त्याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस