शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

काँग्रेसने कॉल डेटा रेकॉर्डचा मुद्दा राज्यसभेत केला उपस्थित; रविशंकर यांनी आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:16 AM

देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) मागण्याचा मुद्दा काँग्रेसने राज्यसभेत उपस्थित केला. देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नोटीस अस्वीकार करीत त्यांना शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली. तथापि, काँग्रेसने केलेला आरोप फेटाळून लावत कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कॉल ड्रॉप समस्या दूर करण्यासाठी आणि दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी सीडीआर मागण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्डशी संबंधित विविध तरतुदींचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले की, असा कोणताही नियम नाही ज्याआधारे सरकारी विभागांना नियमितपणे सीडीआर मागता येतील. देशातील लोकांवर निगराणी राज प्रभावी होताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले की, मी आश्वासन देऊ इच्छितो की, कोणतीही पाळत ठेवली जात नाही. फोन टॅपिंग होत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा