शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 2:38 AM

‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत हरयाणाला ९०० कोटी दिले.

रेवाडी : काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणाने देशाचा नाश केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हरयाणातील ऐलनाबाद आणि रेवाडीमध्ये सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की, काश्मिरातील कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती; पण काँग्रेसने ७० वर्षांपर्यंत याबाबत काहीच केले नाही. आम्ही हे कलम रद्द केले. आपण जर मला पाच वर्षांसाठी स्थिर केले आहे, तर मी ही अस्थायी व्यवस्था का चालू देऊ? संसदेत १९६४ मध्ये एका चर्चेदरम्यान अशी मागणी पुढे आली होती की, कलम ३७० समाप्त करण्यात यावे आणि या मुद्यावर संसदेत चर्चा व्हावी.

त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी हात जोडून मागणी केली होती की, यावर विचार केला जावा आणि कलम ३७० समाप्त करण्यात यावे; पण हा विषय बाजूला ठेवला गेला. काय हतबलता होती? आणि काय खेळ खेळला जात होता? असा सवालही त्यांनी केला. ‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत केवळ हरयाणातच ९०० कोटी रुपये दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

करतारपूर कॉरिडॉरबाबतही मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ७० वर्षे भाविकांना दुर्बिणीने करतारपूर साहिब गुरुद्धाराचे दर्शन करावे लागले. फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणू न शकणे ही एक चूक होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस