शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

UP Election 2022: “BJP ने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 8:58 AM

UP Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाहीभाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेतमहिला सशक्तीकरणातून भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल

जयपूर: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress) सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली आहे. या घोषणेचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. यावरून आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यानंतर भाजपवर टीका केली आहे. भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही, असे म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा प्रियंका गांधी यांनी जाहीर केलेला निर्णय अतिशय स्तुस्त्य असून, त्याचे स्वागत करतो. काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान, राष्ट्रपती दिल्या आहेत. महिला सशक्तीकरणाचे ध्येय घेऊन जाणारा काँग्रेस सर्वांत जुना पक्ष आहे, असे अशोक गेहलोत म्हणाले. 

भाजपने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही

भाजपने आजपर्यंत कधीही कोणत्याही महिलेला पक्षाध्यक्ष बनवले नाही. भाजपच्या विरोधी विचारधारेमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला असुरक्षित आहेत, असा दावा गेहलोत यांनी केला आहे. तसेच महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कुशासन संपुष्टात आणण्याचे काम काँग्रेस करेल, असा विश्वास गेहलोत यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, असे गेहलोत म्हणाले.

दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४०३ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर, काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा