शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:10 IST

Congress Ashok Gehlot And Haryana Assembly Election Result : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे. हरयाणातील निकालाबाबत गेहलोत म्हणाले की, "शेवटी काँग्रेसचाच विजय होईल. राज्यात फक्त काँग्रेसच सरकार स्थापन करेल. ही विचारधारेची लढाई आहे."

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ८ ऑक्टोबरला जोधपूरहून जयपूरला जाण्याआधी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, "तोडाफोडीच्या राजकारणाचं युग संपलं आहे. हरयाणात काँग्रेसचं सरकार स्थापन होणार आहे. भाजपा बदला घेण्याच्या नीतीने काम करत आहे. काँग्रेस सरकारने कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केलं नाही."

तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा. आता वेळ गेली आहे, पूर्वी भाजपा सरकार फोडण्याचं काम करायची असंही ते म्हणाले. राजस्थानात त्यांचं तोडाफोडीचं राजकारण चाललं नाही. राजस्थानमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भाजपाची स्थिती आता कमकुवत झाली आहे. देशातील वातावरण आता बदललं आहे असंही गेहलोत यांनी सांगितलं. ५ ऑक्टोबर रोजी हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान झालं होतं. आता मतमोजणी सुरू आहे.  

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा