शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

“PM मोदींनी देशाला संकटातून बाहेर काढले, राहुल गांधींनी जनतेची दिशाभूल केली”: CM फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:12 IST

CM Devendra Fadnavis Assam Visit: भाजपाला आसाममध्ये मोठा विजय प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

CM Devendra Fadnavis Assam Visit: देशात इंधन टंचाई किंवा गॅस पुरवठ्याबाबत काळजीची कोणतीही परिस्थिती नाही. उलट आपल्या आजूबाजूचे देश, आशियाई देश, युरोपातील देश यांची परिस्थिती पाहिली, तर ती बिकट आहे. युद्धामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन लावले आहे. कोणी आठवड्यातून तीन दिवस काम, चार दिवस काम धोरण लागू केले आहे. भारत असा एकमेव देश आहे, जिथे जनजीवन विस्कळीत झाले नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशाला संकटातून बाहेर काढले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआसामला गेलेले आहेत. पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदी दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासू दिली नाही. गॅस पुरवठ्याची साखळी सुरळीत ठेवली. अशा प्रकारचे व्यवस्थापन क्वचितच आढळून येते. पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. परंतु, इंधन साठा पुरेसा असताना, लोकांना रांगेत उभे केले. पेच प्रसंगात जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केले. हे अत्यंत चुकीचे होते, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

आसामची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी

देशातील गरीब लोकांबद्दल पंतप्रधान मोदींच्या मनात आस्था आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी आधी कुणी घेतले नसतील, असे अनेक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. आसाममधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ए फॉर आसाम हा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. केवळ यापुरते मर्यादित न राहता, ते सत्यात आणून दाखवले. त्यामुळे आसाममधील जनता पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 

भाजपा आणि मित्र पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत

लोकांचा विश्वास प्राप्त करणे महत्त्वाचे असते. लोकांना विश्वास दिला, तर तुम्हाला मोठा जनादेश मिळू शकतो. परंतु, काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस आता लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच काँग्रेसला मते मिळत नाहीत. मी आसाममध्ये जे काही पाहात आहे, त्यानुसार भाजपा आणि मित्र पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi rescued India; Rahul Gandhi misled people: Fadnavis

Web Summary : CM Fadnavis asserted PM Modi steered India through crises, unlike other nations. He criticized Rahul Gandhi for creating panic despite sufficient fuel reserves, while praising Modi's effective management and public support in Assam.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस