शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

"माफ करा, मला उशीर झाला...", फक्त 10 मिनिटे विलंबाबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये मागितली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 8:48 AM

ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : "माफ करा, मला उशीर झाला...", असे म्हणत ज्या व्यक्तीने माफी मागितली आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आहेत. कोर्ट रुममध्ये फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यावर धनंजय चंद्रचूड यांनी हे मोठे मन दाखवून दिले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अत्यंत वक्तशीर आहेत आणि त्याचे पालन करून ते इतर न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याचा मोठा संदेश देत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे. द वीकमधील (The Week) वृत्तानुसार, एक दिवस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोर्टरूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर जेव्हा ते कोर्टरुमध्ये आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली, असे सांगितले जात आहे. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, "माफ करा, मी सहकारी न्यायमूर्तींसोबत काहीतरी चर्चा करत होतो... त्यामुळे उशीर झाला." दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी इतक्या विलंबाबद्दल माफी मागणे काही सामान्य गोष्ट नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी एका मीडिया ग्रुपला दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आठवण करून दिली आणि सांगितले की, ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. इतरांनी वेळेची पूर्ण काळजी घेऊन न्यायालयात पोहोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे इतर सहकारी न्यायाधीशही सुद्धा म्हणतात की, ते सत्य सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतमुख सत्य सांगतात. त्यांची ही खासियत त्यांना सर्वात वेगळी आणि अत्यंत साधी-साधी मनाची व्यक्ती बनवते.

दरम्यान, धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. मागील काही काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव वारंवार चर्चेत आले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या रोखठोक व मिश्कील अशा दोन्ही बाजू सर्वसामान्यांनादेखील भावल्या आहेत. अलीकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या कामांचा आणि सुट्ट्यांचा हिशेब मांडला होता. न्यायाधीश वर्षातले 200 दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय