Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरच्या मादी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी राजौरी येथे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. कलम ३७० आणि ३५ए हे कायदेशीररित्या हटवण्यात आलं नसून ते अवैधरित्या हटवण्यात आल्याचं मुफ्ती म्हणाल्या.
"कलम ३७० आणि ३५ए हे अवैधरित्या हटवण्यात आलं आहे. डाकू जी गोष्ट चोरून नेतात, ती त्याची नसते, त्याला परत आणायचं असतं. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही," असं मुफ्ती म्हणाल्या. "आपण निराश व्हायला नको. परंतु एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्यासाठी भाग पाडलं जाईल आणि सराकरदेखील आपला निर्णय चुकीचा होता, जम्मू काश्मीरला अजून काय हवं आहे हे विचारेल असा विश्वास आहे," असं मुफ्ती म्हणाल्या.