शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:38 IST

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती

नवी दिल्ली - देशातील बड्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी दलित मुलाच्या हत्याकांडावर भाष्य करताना त्यांच्या बालपणीची आठवण सांगितली आहे. त्यांच्या लहानपणीचा काळ अतिशय भयानक होता, याचीच जाणीव त्यांनी करुन दिली. तसेच, आजही काळ बदलला नसून देशात जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं मीरा कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटलं. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातही जातीवाद हाच देशाला लागलेला कलंक आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती. या शिक्षकाने विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली की, त्यामध्ये मुलाच्या कानातून रक्तश्राव सुरू झाला आणि नस फाटली. नातेवाईकांनी लहानग्याला अखेर गुजरातमधील रुग्णालयात नेले. मात्र, चिमुकल्याने आपला जीव सोडला. या मुलाच्या उपचारासाठी नातेवाईक 25 दिवस भटकंती करत होते. मात्र, कोणीही नीट दखल घेतली नाही. विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाकडूनही कुठलीही मदत मिळाली नाही. 

या अस्पृश्य घटनेने देश हादरला असून राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारही या घटनेमुळे निशाण्यावर आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनीही या घटनेवरुन देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बिहारमध्ये जन्मलेल्या मीरा कुमार 5 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्या, केंद्रीयमंत्री आणि लोकसभेत देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणूनही कार्यरत होत्या. मीरा कुमार यांनी जालोरच्या घटनेवरुन एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांची आठवण सांगितली.  100 वर्षांपूर्वी माझे वडिल जगजीवनराम यांनाही शाळेत सुवर्णांच्या डेऱ्यातील पाणी पिण्यापासून अडविण्यात आले होते. कसेतरी त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, आज याच कारणाने 9 वर्षीय दलित मुलाला ठार मारण्यात आले. देशाच्या 75 वर्षानंतरही जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे, कलंक आहे, असे मीरा कुमार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानDalit assaultदलितांना मारहाणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस