शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:38 IST

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती

नवी दिल्ली - देशातील बड्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी दलित मुलाच्या हत्याकांडावर भाष्य करताना त्यांच्या बालपणीची आठवण सांगितली आहे. त्यांच्या लहानपणीचा काळ अतिशय भयानक होता, याचीच जाणीव त्यांनी करुन दिली. तसेच, आजही काळ बदलला नसून देशात जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं मीरा कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटलं. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातही जातीवाद हाच देशाला लागलेला कलंक आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती. या शिक्षकाने विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली की, त्यामध्ये मुलाच्या कानातून रक्तश्राव सुरू झाला आणि नस फाटली. नातेवाईकांनी लहानग्याला अखेर गुजरातमधील रुग्णालयात नेले. मात्र, चिमुकल्याने आपला जीव सोडला. या मुलाच्या उपचारासाठी नातेवाईक 25 दिवस भटकंती करत होते. मात्र, कोणीही नीट दखल घेतली नाही. विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाकडूनही कुठलीही मदत मिळाली नाही. 

या अस्पृश्य घटनेने देश हादरला असून राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारही या घटनेमुळे निशाण्यावर आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनीही या घटनेवरुन देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बिहारमध्ये जन्मलेल्या मीरा कुमार 5 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्या, केंद्रीयमंत्री आणि लोकसभेत देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणूनही कार्यरत होत्या. मीरा कुमार यांनी जालोरच्या घटनेवरुन एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांची आठवण सांगितली.  100 वर्षांपूर्वी माझे वडिल जगजीवनराम यांनाही शाळेत सुवर्णांच्या डेऱ्यातील पाणी पिण्यापासून अडविण्यात आले होते. कसेतरी त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, आज याच कारणाने 9 वर्षीय दलित मुलाला ठार मारण्यात आले. देशाच्या 75 वर्षानंतरही जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे, कलंक आहे, असे मीरा कुमार यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानDalit assaultदलितांना मारहाणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस