शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:02 IST

Rajasthan School Accident:

राजस्थानमधील झालावाड येथील पीपलोद गावात शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, शोकाकुल ग्रामस्थांकडून शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त शाळा ही सुमारे ५० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही सरकारकडे विनवण्या करत होतो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता सरकार आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? असा हृदयद्रावक सवाल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक विचारत आहेत.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना संतप्त ग्रामस्थांनी सांगितले की, शाळेची इमारत जीर्ण झाली होती. बऱ्याच काळापासून तिची दुरुस्ती झालेली नव्हती. आधी जी काही दुरुस्ती कर्यात आली ती केवळ वरवरची मलमपट्टी होती. आम्ही शाळेच्या दुरुस्तीबाबत विनवण्या करून करून थकलो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.  त्यांना झालावाड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांसोबत आलेल्या पालकांना अश्रू अनावर होत आहेत. आमच्या मुलांचा काय दोष होता, अशी विचारणा ते करत आहेत. तसेच शासन आणि प्रशासनामधील वाळवी लागलेल्या व्यवस्थेविरोधात लोकांच्या मनातील संताप धुमसत आहे.

दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, ही दुर्घटना प्रार्थनेनंतर घडली. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले असताना सातवीच्या वर्गावरील छप्पर कोसळले. त्यावेळी वर्गात सुमारे ३५ विद्यार्थी होते. विद्यार्थी वर्गात बसले असतानाच अचानक छप्पर कोसळले. या दुर्घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन मदत कार्य सुरू केले होते. 

दरम्यान, ही दुर्घटना म्हणजे सडलेल्या व्यवस्थेला बसलेली चपराक आहे, अशा भाषेत पीडित ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता नुकसान भरपाई मिळाली तरी त्याचा उपयोग काय? आमची मुलं तर गेली, प्रशासनानं वेळीच आमचं ऐकलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता, आता शासन-प्रशासन आमची मुलं परत आणून देऊ शकतं का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानSchoolशाळाAccidentअपघात