शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:02 IST

Rajasthan School Accident:

राजस्थानमधील झालावाड येथील पीपलोद गावात शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात मुलांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, शोकाकुल ग्रामस्थांकडून शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त शाळा ही सुमारे ५० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी आम्ही सरकारकडे विनवण्या करत होतो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता सरकार आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? असा हृदयद्रावक सवाल या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक विचारत आहेत.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना संतप्त ग्रामस्थांनी सांगितले की, शाळेची इमारत जीर्ण झाली होती. बऱ्याच काळापासून तिची दुरुस्ती झालेली नव्हती. आधी जी काही दुरुस्ती कर्यात आली ती केवळ वरवरची मलमपट्टी होती. आम्ही शाळेच्या दुरुस्तीबाबत विनवण्या करून करून थकलो. मात्र आमचं कुणीच ऐकलं नाही. आता याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.  त्यांना झालावाड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांसोबत आलेल्या पालकांना अश्रू अनावर होत आहेत. आमच्या मुलांचा काय दोष होता, अशी विचारणा ते करत आहेत. तसेच शासन आणि प्रशासनामधील वाळवी लागलेल्या व्यवस्थेविरोधात लोकांच्या मनातील संताप धुमसत आहे.

दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, ही दुर्घटना प्रार्थनेनंतर घडली. विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले असताना सातवीच्या वर्गावरील छप्पर कोसळले. त्यावेळी वर्गात सुमारे ३५ विद्यार्थी होते. विद्यार्थी वर्गात बसले असतानाच अचानक छप्पर कोसळले. या दुर्घटनेनंतर प्रशासन घटनास्थळी पोहोचेपर्यंत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन मदत कार्य सुरू केले होते. 

दरम्यान, ही दुर्घटना म्हणजे सडलेल्या व्यवस्थेला बसलेली चपराक आहे, अशा भाषेत पीडित ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता नुकसान भरपाई मिळाली तरी त्याचा उपयोग काय? आमची मुलं तर गेली, प्रशासनानं वेळीच आमचं ऐकलं असतं तर आज हा दिवस पाहावा लागला नसता, आता शासन-प्रशासन आमची मुलं परत आणून देऊ शकतं का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानSchoolशाळाAccidentअपघात