शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 5:38 AM

त्रिपुरात सहा छावण्या; ३२ हजार जण जगतात हलाखीत

आगरतळा : उत्तर त्रिपुरातील कांचनपूर, पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये अद्यापही राहत असलेल्या ३२ हजार निर्वासितांना सरकारकडून रेशनवर देण्यात येणारे अन्नधान्य व आर्थिक मदत येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. ब्रू जमातीच्या लोकांची मिझोराममध्ये गेल्या २५ आॅगस्टपासून आठ टप्प्यांमध्ये पाठवणी करण्यासंदर्भात त्यांच्या नेत्यांशी केंद्र सरकारने करार केला होता. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत फक्त १४२ लोकांचीच पाठवणी करण्यात आली. सरकारने देऊ केलेली मदत अपुरी असल्याचे सांगून निर्वासितांनी ती नाकारली होती.

सर्व ब्रू निर्वासितांना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने या निर्वासित छावण्यांना देण्यात येणारी मदत गेल्या १ आॅक्टोबरपासून केंद्रीय गृहखात्याने बंद केली होती; मात्र या निर्वासितांची उपासमार होऊ लागल्याने तीन आठवड्यांनंतर त्यांच्यासाठी अन्नधान्य व अन्य गोष्टींचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्वासित छावण्यांची मदत जानेवारीत बंद करण्यात येईल, असे गृहखात्याचे सहसचिव सत्येंद्र गर्ग यांनी त्रिपुरा सरकारला गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. (वृत्तसंस्था)वांशिक दंगलींमुळे त्रस्तच्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एक ते दोन दिवसांत हस्तक्षेप करावा व ब्रू निर्वासितांची मदत यापुढेही सुरू ठेवावी, अशी विनंती त्यांना मिझोराम ब्रू डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम (एमबीडीपीएफ) करणार आहे. ही माहिती या संघटनेचे सचिव ब्रूनो मशा यांनी दिली.च्सन १९९७-९८ साली उसळलेल्या वांशिक दंगलींनंतर मिझोराममधील ब्रू जमातीचे ३७ हजार लोक मामित, कोलासिब, लुंगलेई येथून विस्थापित होऊन त्रिपुरामध्ये आले. तेथील कांचनपूर व पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले होते. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराMigrationस्थलांतरण