शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! निवडणूक जिंकण्यासाठी मित्राच्या पत्नीला घेतले उधार, निकालानंतर...

By बाळकृष्ण परब | Updated: January 12, 2021 15:34 IST

Jara Hatke News : निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नेतेमंडळी वाटेल ते करायला तयार असतात. दरम्यान, असाच एक अजब प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देएका व्यक्तीने निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडून त्याच्या पत्नीला उधार घेतले होतेमात्र ही महिला चेअरमनची निवडणूक जिंकली. तेव्हा तिने तिचा पती आणि मुलांना सोडले आणि पतीच्या मित्रासोबत लग्न केलेया प्रकारामुळे संतापलेल्या या महिलेच्या पहिल्या पतीने आपली पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल केला

देहराडून - निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नेतेमंडळी वाटेल ते करायला तयार असतात. दरम्यान, असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. इथे एका व्यक्तीने निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडून त्याच्या पत्नीला उधार घेतले होते. मात्र ही महिला चेअरमनची निवडणूक जिंकली. तेव्हा तिने तिचा पती आणि मुलांना सोडले आणि पतीच्या मित्रासोबत लग्न केले. या प्रकारामुळे संतापलेल्या या महिलेच्या पहिल्या पतीने आपली पत्नी आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातच या महिलेचे दुसऱ्या पतीसोबतही वाद झाले असून, तिने आपल्या सध्याच्या पतीने भावासोबत मिळून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मुरादाबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला नेता होण्याची लहर आली. त्याने मुरादाबाद जिल्ह्यातील आरक्षित नगरपंचायत चेअरमनच्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या मित्राकडे त्याची पत्नी उधार देण्याची मागणी केली. त्यावेळी निवडणूक लढण्यासाठी केवळ कागदावर विवाह होणार, असे ठरले. तसेच निवडणुकीनंतर मित्राला त्याची पत्नी परत केली जाईल, असे ठरले.दरम्यान, उधारीवर पतीच्या मित्राची पत्नी बनलेली ही महिला निवडणूक जिंकली. त्यानंतर मात्र मित्राची नियत बदलली. त्याने मित्राला त्याची पत्नी परत करण्याऐवजी तिच्यासोबत विवाह केला. सदर महिलासुद्धा चेअरमन बनून आपल्या पहिल्या पतीला आणि मुलांना सोडून नव्या पतीसोबत राहू लागली.त्यानंतर या महिलेच्या पहिल्या पतीने जसपूरच्या न्यायालयात विनंती पत्र देऊन मित्राकडून आपल्या पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशावर दोन वर्षांपूर्वी कुंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हासुद्धा नोंद झाला. दरम्यान, मागच्या काही काळात या महिलाच्या कुटुंबात तिच्या सवतीची ढवळाढवळ वाढली. त्यामुळे चेअरमन बनलेली ही महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे ही महिला स्वतंत्र राहू लागली. त्यानंतर या महिलेने आपल्या दुसऱ्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. तसेच मारहाण झाल्याची फिर्याद दिली.

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकFamilyपरिवारPoliticsराजकारण