शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:01 IST

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे भाजपला पुन्हा एकदा ताकद मिळाली आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम किंवा लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे, ३ राज्यांत भाजपाला मिळालेलं यश हे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. म्हणूनच, भाजपाने सत्ता मिळवलेल्या तीन राज्यांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा लोकसभेसाठीच्या राजकीय फायद्यान्वयेच ठरला जाईल. मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली. या बैठकीत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा झाली. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने येथील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, अशा रणनितीने ही चर्चा झाल्याची माहिती आहे. कारण, भाजपला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान करायचे आहे. 

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांनीही दोनवेळा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळली आहे. त्यामुळे, या तिन्ही राज्यांत याच दिग्ग्जांना संधी मिळणार की भाजपा नवीन चेहरा शोधणार, असा प्रश्न चर्चेत आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, प्रहलाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर आणि वीडी शर्मा यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहे. तर, छत्तीसगडमध्ये रमन सिंह, अरुण साव, विष्णुदेव साय, ओपी चौधरी, रेणुका सिंह यांच्या नावावर खलबतं सुरू आहेत. त्यासह, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, बाबा बालकनाथ, दीया कुमारी, अर्जुन राम मेघवाल, अश्विनी वैष्णव आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचीही नावे या शर्यतीत दिसून येत आहेत. 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जी व्यक्ती लोकसभेच्या सर्वच जागा जिंकू शकते, अशाच उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगढ़ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात ६५ लोकसभा सदस्य असून भाजपाचे लक्ष्य या जागांवर आहे. दरम्यान, आजपर्यंतचा मोदी-शहा जोडीचा इतिहास पाहिल्यास अचानक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपाने धक्कातंत्र वापरले आहे. त्यामुळे, या तीन राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीही भाजपाचे धक्कातंत्र दिसून येईल का, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सरप्राईज देतील का, अशी चर्चा जोर धरत आहे. 

दरम्यान, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या तीन राज्यात गत २०१९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या ६५ पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला किमान या ६२ जागांपेक्षा कमी न होऊ देण्याचे लक्ष्य आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान