शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची दिवाळी

By admin | Updated: October 20, 2014 08:54 IST

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात झालेली विधानसभेची निवडणूक भाजपाच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच लढवित असल्याचे चित्र होते.

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात झालेली विधानसभेची निवडणूक भाजपाच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच लढवित असल्याचे चित्र होते. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर स्वबळावर सत्तेत येण्याचा विश्वास असलेल्या भाजपाचा वारू मात्र १२२ जागांवर थांबला. २००९पेक्षा भाजपाचे संख्याबळ अडीचपटीहून अधिक वाढले. तरीही पक्षाचे मोठ्या प्रमाणात वाढलेले संख्याबळ, पण बहुमत नाही अशा दोन बिंदूंच्या मध्ये मोदींची लाट थांबली. शिवसेनेने ह्यभाजपाला ताकद दाखवतोचह्ण अशी डरकाळी फोडली. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. संख्यात्मक विचार केला तर भाजपाच मोठा भाऊ ठरला. त्यामुळे त्यांचेच फटाके वाजले.

१)विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवला तर शिवसेना सोबत भाजपा आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होईल. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्या आणि पाच वर्षे विदर्भ राज्याचा मुद्दा बाजूला ठेवा या दोन प्रमुख अटींवर शिवसेना युतीसाठी तयार होऊ शकते. त्याला भाजपा काय प्रतिसाद देते यावर युतीचे सरकार होईल की नाही ते ठरेल. असे सरकार स्थापन झाले तर त्या सरकारकडे भक्कम बहुमत असेल आणि ते पाच वर्षे निर्धोक कारभार करू शकेल. अन्यथा युतीत निर्माण झालेली कटुता बघता त्यापेक्षा जास्त कुरघोडी होण्याची शक्यता.

२)राष्ट्रवादीची बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला सत्तेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. हा पर्याय स्वीकारल्यास ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असे ज्या एनसीपीचे वर्णन खुद्द मोदी यांनी केले त्याचे काय, असा प्रश्न निर्माण होईल. राष्ट्रवादीने गेली १५ वर्षे काँग्रेसवर दबावतंत्राचा वापर केला. त्याचीच पुनरावृत्ती हा पक्ष करेल. आपल्या आरोपित माजी मंत्र्यांना वाचविणे आणि सहकार क्षेत्रातील साम्राज्याला संरक्षण मिळविणे हाच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामागील छुपा हेतू असल्याचे बोलले जाते.

३)शिवसेनेच्या सरकारला काँग्रेस, राष्ट्रवादीचा टेकू शिवसेना सरकार स्थापन करेल आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देतील. अर्थात अशा सरकारकरिता काँग्रेस तयार होणे अशक्य आहे. सत्तेच्या घोडेबाजारात सामील होणार नाही, असे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे. परंतु, मतदानाच्या वेळी तटस्थ राहून आणि भूमिकेशी तडजोड केली नाही असे दाखवत काँग्रेस सरकार होऊ देईल. पण ते फारसे टिकणार नाही याचीही काळजी घेईल. याशिवाय, भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण होईल, अशीही एक शक्यता आहे.