शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपा जिंकणार - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:36 AM

राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला.

- नितिन अग्रवालनवी दिल्ली   - राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. देशाच्या विकासामध्ये पूर्वांचलमधील बांधवांचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. दिल्ली प्रदेश भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी पूर्वांचलवर झालेल्या अन्यायाबाबत काँग्रेसला जबाबदार धरले.दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात ‘पूर्वांचल महाकुंभ’मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘२०१४ पूर्वी जे जे सरकार आले, त्यामध्ये काँग्रेसचे सरकार ५५ वर्षे होते. पूर्वांचलवासीयांवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसनेच केला. भाजपा विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. विरोधी पक्षांचे धोरण केवळ नरेंद्र मोदी यांना हटविणे हे आहे. आम्ही मतांचे राजकारण करीत नाही. आमचा पक्ष देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.’पूर्वांचलच्या विकासाचे आश्वासन स्मरणात आणून देत शहा म्हणाले, ‘मोदी म्हणाले होते की भाजपाचे सरकार आले, तर पूर्वांचलचा विकास होईल. तो हिशेब मांडण्यासाठी मी आलो आहे. बिहार, झारखंड, ओडिशासारख्या राज्यांमध्ये झालेल्या विकासावरुन ती किती पुढे गेली आहेत ते दिसून येते. या सर्व राज्यांसाठी काँग्रेसच्या सरकारने केवळ ४ लाख कोटी रुपये दिले होते. पण आमच्या सरकारने केवळ साडेचार वर्षांमध्ये १३.८० लाख कोटी दिले. त्यातील ११ लाख कोटी खर्च झाले आहेत.’मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले, ‘खोटे बोलणे हा त्यांचा एकमेव मंत्र आहे. राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) झालेल्या घुसखोरीवर अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मत स्पष्ट करावे.दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या समस्या आजही जशाच्या तशा आहेत. ३ मुलींचा भूकबळी गेला, तरी ते तिकडे फिरकले नाहीत, असे ते म्हणाले. तिवारी यांनी ‘एनआरसी’ दिल्लीतही लागू करण्याची मागणी केली. केजरीवाल सरकार रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना पायघड्या अंथरत असल्याचाही आरोप केला. सीलिंग करुन लोकांना हैराण करुन सोडले जात असल्याचा आणि या कारवाईत सर्वोच्च न्यायालयाला बदनाम केले जात असल्याचाही आरोप केला.केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, खासदार, आमदार आणि पूर्वांचलमधील नामवंत नेत्यांचा या मेळाव्यात समावेश होता. लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या या मेळाव्याला मोठे महत्त्व दिले जात आहे. या माध्यमातून दिल्लीत मोठ्या संख्येने राहणाऱ्या पूर्वांचलच्या मतदारांचे तुष्टीकरण केले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहBJPभाजपाdelhiदिल्ली