शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:35 IST

भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातील ४ नेत्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. एनडीएच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आणि पक्षविरोधी कारवाईत सहभागी असल्याचा आरोप करत भाजपने ही मोठी कारवाई केली आहे.

शिस्तभंग करणाऱ्यांना कठोर संदेश -भाजप बिहार प्रदेश मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी अधिकृत पत्र जारी करत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित नेत्यांनी पक्षाचे धोरण आणि पक्षाच्या नियांचे उल्लंघन करून एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. "आपले हे कृत्य पक्षविरोधी असून, यामुळे संघटनेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शिस्तभंंगाची ही घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही," असे शर्मा यांनी पत्रात नमूद केले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावे -- १. पवन यादव (कहलगांव विधानसभा)२. वरुण सिंह (बहादुरगंज)३. अनूप कुमार श्रीवास्तव (गोपालगंज)४. सूर्य भान सिंह (बडहरा)

या सर्व नेत्यांनी एनडीएच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

बंडखोरी खपवून घेतली जाणार नाहीत -अरविंद शर्मा यांनी म्हटले आहे की, "भाजप एक अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे, संघटनेची विचारधारा आणि हित हे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा नेहमीच अधिक महत्त्वाचे मानले जाते." महत्वाचे म्हणजे, तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांमध्ये असंतोष दिसत आहे. अनेक बंडखोर नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी भाजपने तातडीने कठोर भूमिका घेत, पक्षाच्या शिस्तीपेक्षा कोणीही मोठे नाही आणि बंडखोरीला थारा दिला जाणार नाही, असा एक स्पष्ट संदेश दिला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या कारवाईच्या माध्यमाने भाजपने निवडणुकीपूर्वीच पक्षातील इतर असंतुष्ट नेत्यांनाही इशारा दिला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ एनडीएचे अधिकृत उमेदवारच पक्षाचा चेहरा असतील, हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Expels Four Leaders Amid Bihar Election Turmoil for Rebellion

Web Summary : Amid Bihar elections, BJP expelled four leaders for six years for contesting against NDA candidates and anti-party activities. The party emphasized discipline and warned against rebellion, signaling unity ahead of polls.
टॅग्स :BJPभाजपाBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024