शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा - बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 1:47 AM

राज्यात पथक पाठविल्याबद्दल केली टीका

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात पथक पाठविण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमधील जनादेश भाजपने स्वीकारावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले व त्यात तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या. त्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले आहेत. 

“मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रेही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय पथक आलेही आहे. राज्यात जनतेने भाजपला स्वीकारले नाही म्हणून असे घडत आहे, ” असे बॅनर्जी म्हणाल्या. “जनादेशाचा स्वीकार करण्याचे मी भाजपला आवाहन करते. आपल्याला कोरोना संकटाला तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना धोरणावरच प्रश्न उपस्थित केला. “केंद्राकडे कोरोनासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पारदर्शक धोरण नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे,” असे बॅनर्जी म्हणाल्या. 

भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करून, अजूनही राज्याला पुरेशा लसी मिळालेल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल