शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:35 PM

ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देतथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेततथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे जनसेवेपेक्षा सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. मात्र ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. तथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव असून, बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.  राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेकजण अखेरच्या श्वासापर्यंत पदाला चिकटून राहतात. मात्र प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला असूनही सत्पथी यांनी राजकारण सोडून आपला मूळ पेशा असलेल्या पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या. नंदिनी सत्पथी यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 

 तथागत सत्पथी हे ओदिशामधील ढेंकनाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  दरम्यान, पत्रकारितेमध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाबाबत ते म्हणाले की, ''सध्या पत्रकारितेला निडर आणि निर्भिड आवाजांची गरज आहे. त्यामुळे पत्रकारितेवर पुन्हा एकदा लक्ष्य केंद्रित करण्यासाठी मी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दीर्घ राजकीय प्रवासादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल मी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा आभारी आहे. मात्र आता जनसेवेसाठी राजकारण हे माध्यम नाही याची जाणीव मला झाली आहे.'' 

 दरम्यान, आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांचेही सत्पथी यांनी आभार मानले आहेत. ज्या मतदारांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा आणि प्रेम दिले त्यांचे मी आभार मानतो. देशामध्ये सामाजिक नेतृत्वाचा अभाव आहे तसेच युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचीही हीच योग्य वेळ आहे.'' असेही सत्पती म्हणाले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiju Janata Dalबिजू जनता दलOdishaओदिशाIndiaभारत